
Pune Metro, Real Estate Pune, Hinjawadi Metro
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे या परिसरात निवासी मालमत्तांना मोठी मागणी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या २३ किमी लांबीच्या मेट्रो लाईन ३ पैकी पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवर मे २०२६ पासून सेवा सुरू झाली आहे. संपूर्ण मार्गिका पूर्णत्वाकडे जात असून, गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि बाणेर-शिवाजीनगर डबल डेकर उड्डाणपुलामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाशी संपर्क अधिक सुलभ होत आहे. या सुधारित कनेक्टिव्हिटीचा फायदा बाणेर, बालेवाडी, वाकड आणि ताथवडे या विकसित भागांसोबतच मान आणि पुनावळे या उदयोन्मुख बाजारपेठांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
“मेट्रो लाईन ३ मुळे हिंजवडी व मध्यवर्ती पुण्यातील प्रवासाचा वेळ वाचेल. बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडी कमी होऊन डेक्कन व सिव्हिल कोर्टसारख्या भागांत पोहोचणे सुलभ होईल. यामुळे परिसरातील राहणीमानात सकारात्मक बदल घडत आहेत.”
— सचिन भंडारी, सीईओ व कार्यकारी संचालक,
अनारॉक संशोधन च्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ने ३२.४६ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेतली. यातील सुमारे १५ टक्के (४.८ दशलक्ष चौरस फूट) व्यवहार एकट्या पुण्यात झाले आहेत. यामुळे पश्चिम पुण्यात कार्यालयीन आणि निवासी दोन्ही क्षेत्रांत प्रचंड मागणी निर्माण झाली आहे.
हिंजवडीच्या आजूबाजूला मोठ्या भूखंडांची उपलब्धता असल्याने विकासक आता एकात्मिक टाउनशिप आणि मिश्र-वापर प्रकल्पांवर भर देत आहेत. व्हीटीपी रियल्टी सारख्या संघटित विकासकांनी पायाभूत सुविधांच्या विकासाशी सुसंगत रणनीती आखत मान आणि पुनावळे यांसारख्या उच्च-वाढीच्या कॉरिडॉर मध्ये नवीन प्रकल्पांची घोषणा केली आहे. एकंदरीत, रस्ते आणि मेट्रोच्या भक्कम जाळ्यामुळे पश्चिम पुण्याचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत स्वरूपात होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.