Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोवर शेतीचे पाणी…”; दिलीप वळसे पाटलांची नागरिकांना ग्वाही

युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील यांनी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2024 | 09:13 PM
"जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोवर शेतीचे पाणी..."; दिलीप वळसे पाटलांची नागरिकांना ग्वाही

"जोपर्यंत माझ्यात श्वास आहे तोवर शेतीचे पाणी..."; दिलीप वळसे पाटलांची नागरिकांना ग्वाही

Follow Us
Close
Follow Us:
मंचर: आंबेगाव तालुक्यातील शेतीचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी जोपर्यंत माझ्यात श्वास आहे, तोपर्यंत सुरक्षित राहणार ,हे पाणी कोणीही घेऊन जाणार नाही. पुढील पाच वर्ष मतदारसंघातील प्रलंबित राहिलेले पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दिली जातील, अशी ग्वाही आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी 18 रोजी दिली.

मंचर तालुका आंबेगाव येथे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विजय निर्धार मेळाव्या च्या सांगता सभेला मार्गदर्शन करताना उमेदवार दिलीप वळसे पाटील बोलत होते .उमेदवार दिलीप वळसे पाटील म्हणाले मला कोणती ईडीची , सीबीआयची किंवा कोणतीच नोटीस नाही .त्या भीतीने मी भाजप सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सहभागी झाल्याची विरोधी उमेदवार चर्चा करतात, परंतु मी आज मतदार बंधू-भगिनींच्या साक्षीने सांगतो की मला कोणतीही नोटीस आजवर आलेली नाही .जर कोणाला नोटीस मिळाली तर मी माझी उमेदवारी मागे घेईल, केवळ विकासाचे कोणतेही मुद्दे विरोधकांकडे नाही बदनामी आणि धांगडधिंगा करून विकास होत नाही, त्यामुळे  बेताल वक्तव्य करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.

परंतु येथील जनतेला माहिती आहे की कोण खरं आणि कोण खोटं. समोरील उमेदवार प्रचारांमध्ये यांची नार्कोटेस्ट करा, अशी जाहीर मागणी करत आहे तर माझेही म्हणणं आहे की माझी नार्को टेस्ट करा माझ्यातून  विकासच बाहेर येईल .परंतु तुमचे नार्को टेस्ट केली तर तुम्हाला बाहेर फिरणं मुश्किल होईल. अशी टीका करत उमेदवार वळसे पाटील यांनी विरोधी उमेदवारावर हल्लाबोल केला.

केवळ विकासाच्या मुद्द्यावरच आणि पुढील पाच वर्षात मी काय काम करणार या अजिंठ्यावरच ही निवडणूक लढवत आहे. परंतु समोरच्या उमेदवार मात्र विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून वैयक्तिक, आकसापोटी टीका करतात त्यांच्याकडे कोणतेही विकासाची व्हिजन नाही. परंतु  तुमच्याकडे पुढील विकासाचा  अजंठा काय आहे .याचा मात्र त्यांच्याकडे थांगपत्ता नाही. बदलापूर पासून तर समोरील  उमेदवाराचे गाव असलेल्या नागापूर गावापर्यंत झालेले दुषकृत्य बरोबर नाही त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आंबेगाव चे पाणी सुरक्षित राहण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे .त्यामुळे येथील जनतेने मला भरघोस मताने विजयी करावे ,असे आवाहनही  उमेदवार वळसे पाटील यांनी केले.

हेही वाचा: ‘माझं मन साफ, माझ्या मनात तेच ओठावर, वळसे-पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार’; शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास

पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले निवडून दिलेल्या खासदाराने केवळ मतदारांची दिशाभूल चालवली आहे. कोणतेही काम न करता थेट लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत भूलवलया करण्यासाठी ते येथे येतात, येथील समोरचे उमेदवार देवदत्त निकम यांची खिल्ली उडवताना आढळराव पाटील यांनी जोरदार टीका केली .ते म्हणाले देवदत्त निकम हे केवळ चुकीच्या पद्धतीने राजकारण करून विकास साध्य करू शकत नाही, शरद पवार यांच्या सभेत लाव रे व्हिडिओ म्हणणारे निकम यांनी रात्री घरी व्हिडिओ लावून पहावे. असा टोला लगावत निकम यांना आता पाडा, पाडा ,पाडा असे मी सांगतो .त्या पद्धतीने मतदाराने साथ द्यावी. असे आवाहन करून आढळराव पाटील म्हणाले .

वळसे पाटलांसारखा सुसंस्कृत नेता महाराष्ट्रा सहआंबेगाव विधानसभा मतदारसंघाला लाभला आहे .त्यामुळे त्यांना मतदान करून विकासाला साथ द्यावी आणि बोगद्याला साथ देणाऱ्यांचे पितळ उघडे पाडावे .असे आवाहनही त्यांनी केले. युवा नेत्या पूर्वा ताई वळसे पाटील यांनी गेल्या 35 वर्षात उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी प्रचंड विकास कामे करून आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नाव जिल्ह्यासह राज्यात उंचावले आहे. त्यांच्यामुळे तालुक्याला कधीच कमीपणा आला नाही .परंतु आता समोरील उमेदवारांना  विकास दिसतच नाही, हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण चा बोगदा पाडून माणिक डोह धरणात पाणी नेण्याचा डाव अनेकांनी रचला. त्या माध्यमातून उमेदवार      वळसे पाटील यांनी हे पाणी  माणिकडोहद्वारे नगर जिल्ह्याला जाणार हे ओळखून स्वतःची आमदारकी किंवा राजकीय  प्रतिष्ठा पणाला लावून भाजप सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाला .त्यावेळी ही भूमिका मला पटली नव्हती.

हेही वाचा: “…त्यामुळे त्यांना मतदानातून योग्य उत्तर द्या”; प्रचारादरम्यान वळसे पाटलांची विरोधकांवर जोरदार टीका

परंतु आता मात्र गेल्या दीड महिन्यात विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील काही आमदार ,काही खासदार डिंब्याचं पाणी माणिक डोह धरणात बोगद्याद्वारे नेण्याचा घाट रचत आहे. त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझे बाबा आणि उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय दृष्ट्या घेतलेला निर्णय योग्य आहे. यावर मी शिक्कामोर्तब केले. पाण्यामुळेच आंबेगावची समृद्धी टिकून आहे आणि चुकीच्या पद्धतीने विचार करून जर आपण विकासाला साथ देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला साथ दिली तर तालुक्यासह आजूबाजूच्या शेतीचेही प्रचंड नुकसान होईल. यासाठी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठ्या बहुमताने विजयी करावे असे  आवाहन करते.

शरदचंद्र पवार यांची सभा चार दिवसापूर्वी मंचर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ   झाली. त्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांची आजची सभा रेकॉर्ड ब्रेक झाली. सभेला महिला भगिनींसह मतदारांची प्रचंड गर्दी होती. सभास्थळी पोहोचण्यासाठी उमेदवार वळसे पाटील आणि म्हाडाचे  अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनापायी चालताना 500 फूट  अंतर कापण्यासाठी आणि पोलिसांना मतदारांच्या गर्दीमधून  रस्ता करत  व्यासपीठावर पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला.

उमेदवार दिलीप वळसे पाटील भाषणाला उभे राहतात अजित पवार दिलीप वळसे पाटील, आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाच्या सततच्या घोषणांनी उमेदवार वळसे पाटील यांना भाषण सुरू करता येईना .अखेर शेवटी त्यांनी हात जोडून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करून भाषण सुरू केले .त्यावेळी अधून मधून जय जय कराच्या घोषणा होत होत्या. त्यावेळी वळसे पाटील यांनी पुन्हा मतदारांना शांत राहण्याचे आवाहन करून आपले भाषण सुरू केले.

हेही वाचा: “केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते…”; दिलीप वळसे पाटील यांची देवदत्त निकमांवर टीका

युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील यांनी गेल्या पस्तीस वर्षात उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या  विकासाचा लेखाजोखा  मुद्द्यासहमांडला आणि विकासासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे माझे बाबा उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी करतात दिलीप वळसे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Web Title: Mahayuti ncp ambegaon pune candidate dilip walse patil rally at manchar for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 09:13 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Manchar

संबंधित बातम्या

Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…
1

Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.