Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाचा वाद पेटणार? विजय वडेट्टीवार म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत OBC…”

Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2025 | 02:22 PM
Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाचा वाद पेटणार? विजय वडेट्टीवार म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत OBC..."

Maharashtra Politics: राज्यात आरक्षणाचा वाद पेटणार? विजय वडेट्टीवार म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत OBC..."

Follow Us
Follow Us:
राज्यात आरक्षणाचा वाद पेटला 
आरक्षणाच्या विषयावर ओबीसी समाज आक्रमक 
पुण्यात ओबीसी संघटनांची बैठक 
पुणे: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील ओबीसी संघटनांची तातडीची बैठक घेतली.
बैठकीदरम्यान वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजातील घटकांवर अन्याय होणार नाही, याची राज्य सरकारने हमी दिली पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेताना सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे. अन्यथा गोंधळ आणि असुरक्षिततेचे वातावरण तयार होते.”

लातूर आणि बीडमधील आत्महत्यांबाबत त्यांनी तीव्र खेद व्यक्त करत सांगितले की, तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये. “आपली ऊर्जा संघर्षासाठी वापरली पाहिजे, आत्महत्येसाठी नव्हे. समाजाने एकजूट दाखवल्यासच योग्य तो न्याय मिळेल,” असे त्यांनी आवाहन केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असला, तरी त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होईल का, याबाबत संघटनांमध्ये संभ्रम आहे. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याची सरकारची घोषणा स्वागतार्ह असली तरी पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार यांनी मत मांडले. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असताना, ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर ठोस निर्णय घेणे हेच या प्रश्नाचे दीर्घकालीन समाधान ठरू शकते, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. सरकारने नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. दरम्यान या जीआर नंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’

राज्यात आरक्षणावरून वाद निर्माण झाला असताना छत्रपती संभाजीनगर येथील बॅनरने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरवर आतापर्यंत झालेले 12 मराठा मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर ‘ महाराष्ट्रात 1960 पासून 64 वर्षांच्या काळात आता पर्यंत एकूण 12 मराठा मुख्यमंत्री झाले. मग टार्गेट फडणवीसचं का?’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

मराठा आरक्षण वाद पेटणार! ‘आतापर्यंत 12 मराठा CM, मग टार्गेट फडणवीसच का?’ संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले. मात्र हे आंदोलन करत असताना काही वेळेस तयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी चुकीचे विधान देखील केले होते. जरांगे पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष्य करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावरून देखील राज्यात मोठे राजकारण झाल्याचे दिसून आले.

 

Web Title: Vijay vadettiwar maratha and obc reservation pune meeting maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Pune
  • Reservation News
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
1

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
2

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
4

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.