Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, जनआक्रोश समितीच्यावतीने श्रमदान मोहीम

मुंबई गोवा महामार्गावर पेण येथे रस्त्याची दुर्दशा झाली असून प्रशासनाने याबाबत डोळे झाक केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2025 | 06:47 PM
Raigad News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, जनआक्रोश समितीच्यावतीने श्रमदान मोहीम
Follow Us
Follow Us:

पेण/ विजय मोकल :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाच्या कडेला साचलेली माती, खडी आणि धूळ यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आसल्याने जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्यात आली.मुंबई – गोवा महामार्गावरील खडी आणि धूळ दुचाकीस्वारांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करताना या खडीमुळे घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

मात्र एवढं सगळ होत असतानाही याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वडखळ ब्रिजवरील ही गंभीर परिस्थिती निदर्शनास आणल्यानंतर असे आढळून आले की, अनेक पुलांवरही अशीच परिस्थिती आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तक्रारी नोंदवल्या जातात, मात्र त्यानंतर करण्यात येणारे उपाय अपुरे ठरत आहेत. यामुळे लोकसहभागातून जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

मावळच्या कन्येची सर्वत्र चर्चा! प्रणोती नंबरेला राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सुजाण नागरिक आणि जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबविण्यात आली. कासू येथील पुलाची स्वच्छता करून नागरिकांनी या सामाजिक कार्यात हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रायगडावरून मोठ्या संख्येने मावळे ‘शिवज्योत’ घेऊन येतात. त्यातील काही मावळे अनवाणी असतात. महामार्गावरील खडी त्यांच्या पायाला लागू नये, तसेच कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जर प्रत्येक गाव व विभागातील नागरिक असे सामाजिक प्रश्नांसाठी एकत्र आले, तर निश्चितच मोठे कार्य घडू शकते. यामुळे केवळ रस्ते स्वच्छ होतील असे नाही, तर नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होईल.

“औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून…”; राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याने नितेश राणे आक्रमक

महामार्गावरील सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग दोन्ही आवश्यक आहे. म्हणूनच, अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे असे अवाहन चैतन्य पाटील सुजाण नागरिक जनआक्रोश समिती यांनी केले आहे.

Web Title: Raigad news administrations neglect of mumbai goa national highway shramdon campaign on behalf of jan akrosh committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Mumbai Goa Express Way
  • pen news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
1

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
2

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.