Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कामगारांवर उपासमारीची वेळ;पाच महिन्यांचा पगार थकला, नेरळ ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार

नेरळ ग्रामपंचायती मधील 100 कामगारांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत अशी स्थिती ग्रामपंचायतीची झाली आहे.मागील पाच महिन्यांचे पगार थकले असून नाव मोठे लक्षण खोटे असे नेरळ ग्रामपंचायती बद्दल बोलले जाऊ लागले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2025 | 06:00 PM
कामगारांवर उपासमारीची वेळ;पाच महिन्यांचा पगार थकला, नेरळ ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार

कामगारांवर उपासमारीची वेळ;पाच महिन्यांचा पगार थकला, नेरळ ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

रायगड /संतोष पेरणे: कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रूपांतर व्हावे, यासाठी अनेक वर्षे मागणी केली जात आहे. मात्र सध्याचं नेरळ ग्रामपंचायती मधील 100 कामगारांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत अशी स्थिती ग्रामपंचायतीची झाली आहे.मागील पाच महिन्यांचे पगार थकले असून नाव मोठे लक्षण खोटे असे नेरळ ग्रामपंचायती बद्दल बोलले जाऊ लागले आहे.दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाचे उप शहर प्रमुख संदीप उतेकर यांनी कामगारांचे पगार वेळेवर करण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायतीला दिले आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे वैशिष्ट्य धुळीस मिळविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर सन 2019 मध्ये ग्रामपंचायत नेरळ च्या सार्वत्रिक निवडणूका झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांनी पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारचे नसल्यामुळे त्यांचेकडून थकीत राहिलेल्या देयकांमुळे विद्यमान कार्यकारिणीला अडचणी येत असल्याचे कारण दिलेले होते.कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील सुमारे तीन वर्षापासून मोठा गंभीर चर्चेचा विषय होता व आहे. ग्रामपंचायत नेरळ यांचेकडे ग्रामपंचायत नेरळ च्या या मुलभूत प्रश्नांबाबत योग्य उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.

सध्या नेरळ ग्रामपंचायतीवर प्रशासक असून त्यांना देखील आपल्या कामगार वर्गाचे पगार देण्याचे तंत्र काही जमले नाही. सप्टेंबर पासून नेरळ ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट असून कामगारांचे पगार करता येत नसल्याने ग्रामपंचायत ची वाटचाल नक्की कुणीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे.ऑक्टोबर 2024 पासूनचे वेतन देय असून आतापर्यन्त पाच महिन्यांचे पगार नेरळ ग्रामपंचायत करू शकली नाही.ग्रामपंचायती मध्ये कार्यलयीन आस्थापना आणि अन्य विभागाचे मिळून 100 कामगार असून त्यांना पगारापोटी 23लाख दर महिन्याला पगार म्हणून द्यावे लागतात. एवढे पैसे देखील नेरळ ग्रामपंचायतीकडे नसल्याने आर्थिक डबघाईला ग्रामपंचायत आली असल्याचे चित्र आहे. एका सफाई कामगाराने कर्जाच्या संकटामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि तरी देखील नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासन सुधारले नसल्याने खेद व्यक्त केला जात आहे.

संदीप उतेकर; उपशहर प्रमुख शिवसेना ठाकरे पक्ष

नेरळ ग्रामपंचायतीची अकार्यक्षम आर्थिक नियोजन व्यवस्था आणि प्रशासनाची अनास्था यास कारणीभूत असल्यास योग्य आणि सक्षम आर्थिक अधिकार असलेला उच्च श्रेणीचा अधिकारी यांचेकडे ग्रामपंचायत आर्थिक कोंडी सोडविण्याची जबाबदारी देऊन वारंवार होणारे आर्थिक संकट नष्ट व्हावे या एकमात्र हेतूने व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या आस्थेपोटी हे निवेदन देण्याचे धाडस करीत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी ही सकारात्मक अपेक्षा ठेवत आहे.

अरुण कार्ले– ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे आर्थिक सोर्स हे प्रामुख्याने घरपट्टी आणि पाणी पट्टी आहे. घरपट्टी वसूल हि 50 टक्के पेक्षा धिक जात नाही. तर पाणी पुरवठा सर्व भागाला सुरळीत होत नसल्याने त्या भागातील ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नाहीत आणि त्यामुळे वसुली अभावी कामगारांचे पगार करणे शक्य होत नाही.

Web Title: Raigad news time of hunger for workers five months salary is overdue shocking incident in neral gram panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : शासनाचा महसूल बुडवून कारशेडसाठी मातीचा भराव; खोदकामामुळे पाली भूतीवली धरणाला धोका
1

Karjat News : शासनाचा महसूल बुडवून कारशेडसाठी मातीचा भराव; खोदकामामुळे पाली भूतीवली धरणाला धोका

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
2

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
3

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.