
टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प उभारला जात असून त्या प्रकल्पासाठी कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर खोदकाम करून पाणी साठवले जाणार आहे.त्या खोदकामासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात असून त्याचा परिणाम त्या डोंगराच्या बाजूला आलेल्या तापकीर वाडी आणि धनगरवाडा ग्रामस्थांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत.
तेथे दिवसरात्र खोदकाम सुरु असून प्रकल्प परिसरात खोदकाम करीत असताना होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जवळच असलेल्या वस्तीतील घरांना तडे जात आहेत.तसेच ब्लास्टिंगमुळे संपूर्ण परिसरातील बोअरवेलचे पाणी गेले आहे. परिणामी पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प मधील खोदकाममुले नाल्याला दुषित पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये दुषित पाणी जात आहे. त्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने अनेक साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
टाटा पॉवर परिसरातील झाडे तोडल्यामुळे येथील माकडे गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे घरांचे झाडांचे मोठे नुकसान करतात त्याची पाहणी करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे.
मात्र कंपनी प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस [पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे हे उपोषणाला बसणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आंदोलनात उतरल्याने टाटा कंपनी प्रशासन देखील हडबडले आहे. त्यामुळे उपोषणाच्या आधीच या दोन्ही गावांच्या पुनर्वसन काराबण्याचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.