Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या राजापूरवासीयांवर आता गवा रेड्याचे दुहेरी संकट

वन्य श्वापदांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जनतेतुन होवू लागली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2024 | 04:58 PM
बिबट्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या राजापूरवासीयांवर आता गवा रेड्याचे दुहेरी संकट
Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा रोम जळत होता त्यावेळी राजा निरो फिडल वाजवत होता अशीच काहीशी अवस्था राजापूर तालुक्यात वनविभागाच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. तालुक्यात आता बिबट्यापाठोपाठ गवा रेड्याचा उपद्रव होऊन जनतेचे नुकसान होत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

राजापूर तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण पसरले असतानाच आता पुर्व परीसरात गव्याचाही उपद्रव सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी परुळे येथे गवा रेड्याने सुमारे चाळीस ते पन्नास काजूच्या झाडांचे अतोनात नुकसान केल्याची घटना घडल्याने मोकाट सुटलेल्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. मात्र वनविभाग सुसेगाद असल्याचे चित्र आहे.

गेले काही महिने बिबट्याची दहशत सर्वत्र सुरु असतानाच आता गवा रेड्याचा देखील उपद्रव सुरु झाला आहे. तालुक्याच्या पुर्व परीसरात परुळे गावचे ग्रामस्थ मनोहर विनायक सावंत, यांच्या काजूच्या बागेत घुसुन गवा रेड्याने त्यांची सुमारे ४० ते ५० फळे देणाऱ्या झाडांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये मनोहर सावंत यांचे मोठ्याप्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या वतीने नुकसानग्रस्त बागेची पहाणी करण्यात आली. दरम्यान तालुक्यात वन्य श्वापदांचा उपद्रव वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जनतेतुन होवू लागली आहे.

राजापूर तालुक्याच्या अनेक भागात बिबट्याचा मुक्त संचार दिसत असून यापूर्वी काही जणांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर शहरातही बिबट्या राजरोसपणे फिरत असुन या बिबट्याच्या दहशतीखाली सर्वसामन्य जनता वावरत आहे. राजापूर तालुक्यातील सौंदळ, जुवाठी, कोंड्ये अशा अनेक गावातून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत असताना देखील वनविभाग मात्र हाताची घडी व तोंडावर बोट ठेवुन आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडत असताना या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. याच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात धाउलवल्ली येथे एका शेतकऱ्याच्या दोन वासरांना आपला जीव गमवावा लागला होता.

बिबट्याच्या हल्ल्यात गुरांचे नुकसान होत असताना आता राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर गवा रेड्याचे दुहेरी संकट ओढवले आहे. काही भागात गवा रेड्याने शेती व बागायतीचे नुकसान केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासुन संरक्षण करण्यासाठी वनविभागाने काहीतरी पावले उचलावीत अशी मागणी तालुकातुन होत असताना वनविभाग मात्र सोयर सुतक नसल्याच्या भुमिकेत आहे.

Web Title: Rajapur residents who live under the terror of leopards now face a double threat of gava reda rajapur ratnagiri maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • Forest Department
  • kokan
  • Maharashtra Government
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
1

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…
4

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.