
रत्नागिरीमध्ये मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची फिल्डिंग
मात्र अद्याप निवडणुकीची घोषणा नाही
31 जानेवारीच्या पूर्ण कराव्या लागणार निवडणुका
रत्नागिरी: महापालिकेच्या निवडणुकी पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही जाहीर होईल अशी अपेक्षा या निवडणुकीच्या रिंगणात उत्तरण्यासाठी सज्ज असलेल्या इच्छुकांना होती. मात्र आयोगाकडून मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीबाबत अद्यापही कोणतीच घोषणा झालेली नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात इच्छुक हिरमुसलेले आहेत.
आता पुढील आठवड्यात मिनी मंत्रालयासाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे निवडणूक उमेदवारीचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे दिसून येत आहे त्यामुळे उमेदवार निश्चित करणे ही सर्वच पक्षांसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबतचे संकेत दिले आहेत. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने पेच निर्माण झाला. त्या निवडणुका वगळता उर्वरित पंधरा जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुका दि. ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका दि. ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे निवडणूक यंत्रणेकडून हालवाली सुरू झाल्या आहेत. पढील आठवड्यात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांमधील जुने जाणते नेते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिम बांधून आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमधील पदाधिका-यांचा कार्यकाल संपून सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला, मात्र विविध कारणामुळे वेळेत निवडणूक झाली नाही, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाती हालवाली सुरू झाल्या. जिल्हा परिषदेचे गट, गणाची रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणावर हरकती घेऊन अंतिम निश्चिती करण्यात आली, मात्र या सोडतीमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची तक्रार करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
शेवटच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होण्याबाबत अंदाज व्यक्त
राज्यातील ३२ परिषदापैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यात संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला आहे. न्यायालयात यावाचत सुनावणी सुरू आहे, मात्र ज्या जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली नाही, त्या जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्यात झेडपीची निवडणूक दोन टप्यात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे, सत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाच्या सोडतीमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलाडली नाही. त्यामुळे पहिल्या टप्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.