
कोकणकारणच प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न
बांधकाम विभागावे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियता मिलिदा कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या अखत्यारीत णाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे बुजवण्याचे काम गाने सुरू आहे. या संदर्भात बोलताना अधीक्षक अभियंता मिलिंक कुलकर्णी म्हणाले की, आमच्या खात्याच्या अखत्यारीत २४० किलोमीटर लांबीचा सागरी किनारी महामार्ग, २.१७६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग आणि ७६४ किलोमीटरचे राज्या नार्ग येतात. या सर्व रस्त्यांवर आगामी गणपती सणापूर्वी पूर्णपणे बड़े मुक्ती व्हावी, यादृष्टीने खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करत आहेत, हे काम अधिक वैगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांची मदत घेतली जात आहे.
Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
दुरुस्ती, देखभालीसाठी निधी मंजूर
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पुण्यावरून लाखांच्या संख्येने नागरिक कोकणात दाखल होतात. या काळात रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा जाण असतो, खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात टाळणे, वाहतूक कोंडी रोखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे यासाठी गणेशोत्सवापूर्वी सर्व मुख्य मार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे, रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, त्याबाबत माहिती देताना मिलिद कुलकर्णी यानी स्पष्ट केले की, या कामांसाठी शासनाकडून २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, ही रक्कम केवळ तात्पुरत्त्या खड्डे बुजवण्यासाठी नसून, पूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण वर्षभरातील नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपयोगात आणायची आहे.
मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्याची दुरवस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागाच्या अखत्यारीतील २४० किमी सागरी महामार्ग, २९७६ किमी जल मार्ग आणि ४६४ किमी राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.
गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद