Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : कोयना धरणाला गळती ? तीन महिने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचं संकट

कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2025 | 03:38 PM
Ratnagiri News : कोयना धरणाला गळती ? तीन महिने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचं संकट
Follow Us
Close
Follow Us:
  • कोयना धरणाला गळती ?
  • तीन महिने गावकऱ्यांवर पाणीटंचाईचं संकट
  • नेमकं कारण काय ?
चिपळूण : कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे चिपळूणसह अनेक गावांना 3 महिने पाणीटंचाई जाणवणार आहे. खेर्डी, खडपोली आणि लोटे एमआयडीसीलासुद्धा टंचाईची झळ बसणार आहे.

कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या अप्पर एक आणि दोनला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. गळती दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोयना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यानी गेल्या महिन्यात दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सह्याद्रीच्या डोंगरातील बोगदा सुमारे 300 फूट खोल आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची होती. त्यामुळे टप्पा एक आणि दोनला होणारा पाणीपुरवठा सुमारे पाच दिवस बंद केला होता. त्यावेळी पोफळी ,फणसवणे, शिरगाव, तळसर, मुंढे या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ते पुढौल तीन महिने चालणार आहे. त्यामुळे तीन महिने कोयना धरण आणि कोळकेवाडीधरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोयना धरणातून येणारे पाणी प्रथम टप्पा एक आणि दोनमध्ये घेतले जाते. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर ते पाणी चौथा टप्प्याकडे सोडले जाते. चौथ्या टप्प्यात वीजनिर्मिती झाल्यानंतर ते पाणी कोळकेवाडी धरणात आणले जाते, कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर कोयनेचे पाणी कालव्याद्वारे वाशिष्ठीमध्ये सोडले जाते.

‘देव तारी त्याला कोण मारी’, अपघातात 37 प्रवासी जखमी, मात्र 1 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला, आंबा घाट वळणावरील घटना

वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे कोयनेचे अवजल उचलण्यासाठी चिपळूण नगरपालिका आणि एमआयडीसीने नदीलगत जॅकवेलची उभारणी केली आहे. पोफळी परिसरातील पाच गावांना ग्रॅव्हिटीमधून पाणी दिले जाते. आता दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतर येणारे पाणी बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र महानर्मिती कंपनी, जलसंपदाविभागाने ग्रामपंचायतींना यापूवी पाठवले आहे. मात्र ठोस उपाययोजना कोणत्याही ग्रामपंचायतीने केलेली नाही. गावातील जुन्या विहिरी उपसण्याचे काम सध्या काही टिकाणी सुरू आहे. कोळकेवाडी धरणातून पाण्याची नवीन लाईन प्रकल्पग्रस्त पाच गावांसाठी देण्याची मागणी ग्रामस्थानी केली होती, परंतु ती खर्चिक असल्यामुळे तो प्रस्तावही मागे पडला आहे. त्यामुळे बोगद्याचे काम हाती घेतल्यानंतर पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

चिपळूणमध्ये मतमोजणीपूर्वी तणाव! नगराध्यक्ष उमेदवारासह २६ जणांकडून EVM सुरक्षेसाठी ‘Z प्लस’ सुरक्षा आणि जॅमरची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोयना धरणाच्या बोगद्यात नेमकी कोणती समस्या निर्माण झाली आहे?

    Ans: कोयना प्रकल्पाच्या अप्पर टप्पा 1 आणि 2 ला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती इतकी गंभीर आहे की सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी बाहेर पडत आहे, त्यामुळे तातडीच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.

  • Que: दुरुस्तीचे काम किती काळ चालणार आहे?

    Ans: निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दुरुस्तीला सुरुवात झाल्यावर संपूर्ण काम अंदाजे तीन महिने चालेल.

  • Que: दुरुस्तीच्या काळात कोणते टप्पे बंद राहणार आहेत?

    Ans: कोयना प्रकल्पाचा टप्पा 1 आणि टप्पा 2 सुमारे तीन महिने पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे, कारण बोगदा त्याच टप्प्यांना पाणीपुरवठा करतो.

Web Title: Ratnagiri news leak in koyna dam villagers face water shortage for three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Koyana
  • ratnagiri news
  • water issues

संबंधित बातम्या

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव
1

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
2

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…

अवघी 9 महिन्यांची चिमुकली पाण्यात ढकललं अन्… रत्नागिरीच्या चिमुकलीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
3

अवघी 9 महिन्यांची चिमुकली पाण्यात ढकललं अन्… रत्नागिरीच्या चिमुकलीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात 65 टक्के मतदान; मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांचा हिरमोड
4

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात 65 टक्के मतदान; मतमोजणी पुढे गेल्याने उमेदवारांचा हिरमोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.