Maharashtra Jeevan Pradhikaran मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १८० निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
खेर्डी परिसरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मेलेल्या माशांचा खच जमा झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे.
तालुक्यातील खाडीपट्टय़ातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे.
गुरुवारी दुपारनंतर वादळी वारा झालेल्या व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे चिपळूणमध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील घरांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीसह राज्यभरातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झाला आहे. ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
केवळ घरगुती वापरासाठीच नाही, तर स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले.
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
अनेकदा शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थी संख्येची आकडेवारी फुगवून सांगितली जाते. हा ‘आकडेवारीचा खेळ’ थांबवण्यासाठी प्रत्यक्ष शाळेत जाऊन हजेरी घेण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत.
रामपूर येथील भीषण हत्याखंडाचा अवघ्या 24 तासात तपास लावून आरोपींना गजाआड करणारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना पेन्शन वेळेवर न मिळाल्याने त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १३ एप्रिलपासून उपोषण व साखळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहोळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे यांच्या हस्ते 'आदर्श जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली होती.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे.