मुंबई : उशीरानं का होईना मुंबईत पावसाचं आगमन झालं. मुंबईतील उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली असली तरी या पहिला पावसाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली असं म्हणत मुंबईकरांकडून पहिल्याच पावसात संताप व्यक्त झाला. याच मुद्द्याला केंद्रीत करुन आज सामनातून (Saamana) शिंदे सरकारवर (shinde governmen) निशाणा साधण्यात आला आहे.
[read_also content=”काहीतरी हटके! चक्क अंतराळात विश्वचषक ट्रॉफीचं लाँचिंग, बीसीसीआय सचिवांनी शेअर केला व्हिडिओ https://www.navarashtra.com/sports/icc-world-cup-2023-trophy-launched-120000-above-earth-bcci-secretary-jay-shah-tweeted-video-nrps-423497.html”]
शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. कारण फक्त वल्गना, घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही. पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘पावसाचे स्वागत करा, तक्रारी काय करता?’ असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत. हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका! असा टोला शिंदे सरकारवर साधण्यात आला आहे.
मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले
रखडलेल्या मान्सूनने अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपायदेखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. कारण शनिवारच्या पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत. अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले. यावेळी पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले. 70 मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच उफराटे सवाल करून धारेवर धरणारे राज्यकर्ते मिंधे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत. तुंबलेल्या पाण्यामुळे हवालदिल झालेल्या जनतेला ‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा म्हणत आहेत.