Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या नाहीतर…., संभाजी ब्रिगेडचा इशारा

शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण वाटावं असं काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा.

  • By साधना
Updated On: Feb 13, 2023 | 06:53 PM
eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari

eknath shinde and devendra fadnavis with appasaheb dharmadhikari

Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) जाहीर करण्यात आला आहे. मात्र आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड जनआंदोलन उभे करेल. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण वाटावं असं काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा. आप्पा धर्माधिकारी किंवा त्यांचे वडील पूर्वी नाना धर्माधिकारी यांना समाजसेवा म्हणून पुरस्कार दिला जातो. तर यांच्या हातून अशी कुठलीही समाजाची सेवा घडल्याचं आम्हाला माहिती नाही. कारण की हे पूर्णतः आरएसएसचे काम करतात. रामदासी बैठका घेतात. तसेच सर्वसामान्य माणसांची, महिलांची, तरुणांची दिशाभूल करतात, असा आरोप भानुसे यांनी केला.

[read_also content=”पहाटेच्या शपथविधीची पुन्हा निघाली आठवण, गिरीश महाजनांचा अजित पवारांना बंडखोरीवरून टोला, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/girish-mahajan-reply-to-ajit-pawar-on-rebell-nrsr-369527.html”]

या राज्याला या देशाला जो जिजाऊ, शिवरायांचा एक वारसा लाभलेला आहे. समतावादी, समानतावादी, मानवतावादी त्या सर्व बाजूंनी जर विचार केला तर त्यांना त्याचा पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हे अत्यंत चुकीच आहे. ही आमची मूळ भूमिका असल्याचेही संभाजी ब्रिगेडने म्हटले.

धर्माधिकारी यांच्यापेक्षाही अतिशय चांगलं काम करणारे कोकणामध्येच लोकांचे जीव वाचवणारे हिम्मतराव बाविस्कर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी अहोरात्र काम करणारे वकील पुरुषोत्तम खेडेकर, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे, इतिहास संशोधक प्रा मा. म. देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, याचबरोबर आदिवासीसाठी मेळघाटमध्ये डॉ. कोल्हे दांपत्य काम करतात. समाजाच्या सर्वसामान्य घरापर्यंत आणि सर्व धर्मीयांमध्ये पोहोचलेले विदर्भामध्ये सत्यपाल महाराज आहेत. असे अनेक मान्यवर आहेत. या लोकांना का दिला नाही. केवळ आणि केवळ एका समाजाचे, आरएसएसचे काम करणाऱ्या लोकांनाच हा पुरस्कार द्यायची ही महाराष्ट्र शासनाची भूमिका असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर संभाजी ब्रिगेड बहिष्कार टाकत असून, महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत आहे. त्वरित महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल,असा इशारा देखील यावेळी संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.

Web Title: Sambhaji brigade objection on maharashtra bhushan award given to appasaheb dharmadhikari nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2023 | 06:41 PM

Topics:  

  • maharashtra bhushan
  • Marathi News
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात
1

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला
2

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
3

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
4

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.