Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळ आली पण काळ आला नव्हता; ओढ्यात वाहून गेलेले दोघेजण प्रसंगावधानामुळे बचावले

शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडी दरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दाेघेही बचावले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2024 | 11:40 AM
वेळ आली पण काळ आला नव्हता; ओढ्यात वाहून गेलेले दोघेजण प्रसंगावधानामुळे बचावले
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : शिराळा तालुक्यातील निगडी-पाडळीवाडी दरम्याच्या ओढ्यास शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दाेघे दुचाकीस्वार वाहून गेले. केवळ प्रसंगावधान राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दाेघेही बचावले. वेळ आली हाेती, परंतु काळ आला नव्हता, या म्हणीचा प्रत्यय आला. शनिवारी रात्री ही घटना घडली.

तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता जाेरदार पाऊस झाला. निगडी-पाडळीवाडी दरम्यान असलेल्या ओढ्याला अचानक पाणी वाढले. दरम्यान, पाडळीवाडीचे बाबासाहेब काशीनाथ पाटील (वय ४५) व मारुती दादू पाटील (वय ४६) कामानिमित्त निगडी येथे आले होते. पावसाचा जोर वाढल्याने, त्यांना गावातच थांबावे लागले. रात्री दहा वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने दोघे दुचाकीवरून पाडळीवाडीस परतत हाेते. यावेळी ओढ्याचे पाणी पुलावरून जात होते. रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दाेघेही क्षणात दुचाकीसह ओढ्यात वाहून गेले.

बाबासाहेब पाटील यांना पोहता येत होते. तीनशे फूट वाहत गेल्यावर झाडाच्या फांदीचा आधार घेत ते कसेबसे पाण्याबाहेर पडले. शेतातून वाट शोधत ते ओढ्यापासून शंभर फुटावर सुनंदा साळुंखे यांच्या घरात आले. साळुंखे कुटुंबास आपला मित्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगून गावातील लाेकांना मदतीसाठी बाेलावण्यास सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सुनंदा साळुंखे, त्यांचा मुलगा अनिकेत यांनी गावातील लोकांसह व पशुवैद्यक डॉ. दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली.

अंधारात बॅटरीच्या उजेड पाडत मारुती पाटील यांचा शोध सुरू केला. घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर ते झाडाला पकडून थांबल्याचे दिसून आले. तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले. रविवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकीही सापडली.

साळुंखे कुटुंबीयांची सतर्कता

शनिवारी रात्री पुलावरून पाणी जात हाेतेे. पाण्याचा मोठा प्रवाह आहे, हे लक्षात आल्यानंतर जवळच राहत असलेल्या साळुंखे कुटुंबीयांनी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावली. मोठा पाऊस असतानाही सुनंदा साळुंखे यांनी घरासमोर उभे राहून, दूध गाड्यांसह अनेक चारचाकी व दुचाकी वाहने परत पाठवली. त्यामुळे माेठी दुर्घटना टळली.

Web Title: Sangli news 2 people saved while swept away nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.