सांगलीच्या जत तालुक्यातील खलाटी येथे वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून ८ महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले आहे.
जत तालुक्यामधील मोटे वाडी मध्ये असणाऱ्या मरगूबाई मंदिराच्या यात्रेनिमित्त एकत्र आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून सोसाट्याचा वारा आणि वादळ सुटल्याने निवारा शेडच्या बाजूला आडोशाला उभ्या असलेल्या भाविकांवर ही भिंत…
सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेत वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून परिसरात शोककळा पसरली आहे.
फिर्यादी विज्ञान प्रकाश माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चित्रपट निर्मितीच्या नावाखाली मुच्छल यांनी त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने माने यांनी वारंवार पाठपुरावा केला.
सांगलीत विश्वजीत कदम आणि गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. कदमांनी पडळकरांना 'महाराष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प' म्हणत टोला लगावला आहे
सांगली जिल्हा परिषदेत खातेवाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जुंपली. अखेर जयंत पाटलांच्या मध्यस्थीनंतर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना शिक्षण-आरोग्य खाते मिळाले.
डॉ. मैनक घोष हे २०१९ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत . त्यांची ओळख एक अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे.
सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले; पण यावेळी ते परतलेच नाहीत, शेतात गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. ही बातमी कळताच मळणगावात एकच हंबरडा फूटला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा…
सांगली जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या ६०.९४% प्रवेशांची नोंद. गुढीपाडव्याला ११,१४२ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. वाळवा तालुका पिछाडीवर तर विटा-तासगाव आघाडीवर.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या शीतल बाबर आणि विकास आघाडीच्या प्रतिमा मोरे यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली. यामुळे मुख्य लढत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात झाली.
जत शहरात २० लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवन उभारले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले असून बांधकामासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.
शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग (तात्या) इंगळे हे निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर इंगळे यांच्या कथित अपहरणाची माहिती समोर आल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
सांगलीतील चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्या गावात घडलेल्या या राजकीय बदलामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटनेते निवडीवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप करत विलासराव जगतापांनी व्यक्त केला संताप. सत्तास्थापनेचे समीकरण नव्या वळणावर.
दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.
मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे दिली…