माजी खासदार संजय पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद बैठक बोलावली असून, बुधवारी दुपारी २ वाजता तासगाव येथील जनाई मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे.
आमदार सत्यजित देशमुख यांच्या सूचनेनुसार, पुढील उपचार कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात सुरू आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी भेट देऊन विचारपूस केली.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शनिवारी दिनांक २७ सप्टेंबरला होणारा कार्यकर्ता संवाद मेळावा अतिवृष्टीमुळे रद्द झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनी अखेर या मेळाव्याची नवीन तारीख जाहीर केली आहे.
सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यानंतर शरद पवार गटाकडून सांगलीमध्ये आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सांगलीच्या मनेराजुरी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली.
रेशनकार्डवरील नाव कमी करणे किंवा वाढवणे, दुबार, जीर्ण शिधापत्रिका नवीन तयार करणे, डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये ई-पीक पाहणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
पूरनियंत्रण करण्यासाठी केंद्राकडून माझ्या लोकसभा सदस्य काळात केंद्र शासनाकडून निधी आणला आहे, त्यासाठी नियोजन करून योग्य काम करण्यासाठी नवे आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेणार आहे.
उपसा सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही विषद केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने काम करू, असे सांगितले.
लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या मंडळींनी साजरी करू दिली नाही. 'आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही. तू आमच्यासोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा,' अशी संशयितांनी जबरदस्ती केली.
जत बस स्थानकातील हिरकणी कक्ष हा फक्त नावालाच झाला आहे. तेथे स्वच्छता राखली जात नसल्याने महिला वर्गांकडून त्याचा वापर केला जात नाही. परिणामी, हिरकणी कक्षाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
शिरोळ, राजापूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जोडणारा दत्तवाड-एकसंबा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तर कनवाड-म्हैशाळ हा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ४ मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आणि विरोधी असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजकारण वाळवा तालुक्यात केंद्रित झाले आहे.
चाकीच्या शेजारी असलेल्या कारला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजच्या अंगणात लावलेल्या अन्य मोटारींना ही आग लागली. भेदरलेल्या सुर्यवंशी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकतच गेली.