Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : राजकारणी साहित्य संमेलनात कशासाठी येतात? शरद पवारांनी थेट सांगितलं

साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतुट नाते आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा उल्लेख नेहमीच होत असतो. शिवाय राजकारण्याचा साहित्य संमेलनाशी संबंध काय असा प्रश्नही विचारला जातो.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 21, 2025 | 10:15 PM
राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं

राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

साहित्यिक आणि राजकारणी यांचे एक अतुट नाते आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा उल्लेख नेहमीच होत असतो. शिवाय राजकारण्याचा साहित्य संमेलनाशी संबंध काय असा प्रश्नही यानिमित्ताने नेहमीच विचारला गेला आहे. त्यावरून वाद ही झाले आहेत. मात्र या वादावरून 98 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पडदा उठवला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी शरद पवारांनी याबाबत भाष्यकरत आपली भूमीका मांडली आहे. यावेळी संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

साहित्य संमेलन म्हटलं की इतर गोष्टींची चर्चा नेहमीच सुरू होते असं शरद पवार यावेळी म्हणाले. त्यात नेहमीचाच विषय असतो, तो म्हणजे राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? यावर संमेलना आधी लिखाण ही केलं जातं. टीका ही होते. काही जण समिक्षा ही करतात. मात्र आपलं याबाबत स्वच्छ मत आहे. ते म्हणजे यावर वाद कशाला करायचा? लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांनी या क्षेत्राला प्रतिष्ठा दिली.

महाराष्ट्राचा इतिहास पाहीला तर कलेला राजांनी ही राजाश्रय दिला होता. छत्रपती संभाजी महाराज हे त्याचे बोलकं उदाहरण आहे असं ही यावेळी शरद पवार म्हणाले. राजकारणी तर साहित्य क्षेत्रात आलेच, पण अनेक साहित्यिकांनीही राजकारणाच्या आखाड्यात आपलं नशिब आजमावलं आहे. रा. धो. महानोर, लक्ष्मण माने यांचा उल्लेख या निमित्ताने शरद पवारांनी आवर्जून केला. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांची फारकत होऊ शकत नाही. ते एकमेकांना पूरक असू शकतात असं ही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवर्जून आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असं पवार म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी मराठी भाषेचे विषुद्धीकरण सध्या होत असल्याचे सांगितले. ते टाळणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले. या साहित्य संमेलनाचा सर्व मराठीजनांनी आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.

Web Title: Sharad pawar speech in 98 akhil bharatiya marathi sahitya sammelan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • PM Narendra Modi
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य
1

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द
2

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

Maharashtra Breaking News Updates Today: इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो
3

Maharashtra Breaking News Updates Today: इंधनाची वाढती मागणी, साठेबाजीचा संशय; कांद्याचा खरेदी दर 15 रुपये किलो

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
4

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ तात्काळ मागे घ्या, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.