Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amaravati News : रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर, केवळ ५ हजार हेक्टरवरच लागवड; रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले

यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या पिकांच्या मर्यादित क्षेत्रावरच पे

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2025 | 03:56 PM
रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर, केवळ ५ हजार हेक्टरवरच लागवड; रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले

रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर, केवळ ५ हजार हेक्टरवरच लागवड; रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले

Follow Us
Close
Follow Us:
  • आतापर्यंत फक्त पाच हजार हेक्टरवरच पेरणी पूर्ण
  • पावसामुळे जमिनीत ओलावा अधिक
  • मंडीचा पूर्णतः प्रारंभ न झाल्याने शेतकरी पेरणीपासून दूर

Amaravati News In Marathi : अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी यंदा २ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त पाच हजार हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा अधिक आहे. मंडीचा पूर्णतः प्रारंभ न झाल्याने शेतकरी पेरणीपासून दूर आहेत. त्यामुळे हंगामात उशीर होत आहे आणि कृषी नियोजनावर परिणाम दिसून येत आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या पिकांच्या मर्यादित क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. सध्या हरभऱ्याला सर्वाधिक पसंती मिळत असून, त्याची पेरणी हळूहळू काढते आहे. थंडीचा प्रभाव वाढताच गव्हाची पेरणीही वेग घेईल, अशी शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी-वाली विंडी, बियाणे उपलब्धता, सिंचन व्यवस्थापन आणि योग्य खत वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना बियाणे आणि खत पुरवठा नियमित असला तरी, वीजपुरवठ्याची अनियमितता आणि मजूरटंचाई यामुळे शेतमजुरी व सिंचनाच्या कामात अडचणी येत आहेत.

मुलाच्या नावाने जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

ओलावा कायम, पण थंडीचा अभाव

ऑक्टोबरअखेरपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नांगरणी व पेरणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात घट
होऊन थंडीचा जोर चावेल, ज्यामुळे पेरणीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे.

सिंचनासाठी धरणात मुबलक पाणी

चंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणी मुचलक साठा असल्याने रब्बी हंगामासाठी सिंचन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र, वीजपुरवठा अनियमित असल्याने मोटारींच्या वापरात अडथळे येण्याची शक्यता आहेत.

मजूरटंचाईचा बसतो फटका

शेतमजुराचा तुटवडा बाढल्याने लागवड व सिंचनाच्या कामात उशीर होत आहे. गावाबाहेरील मजूर परत न आल्याने आणि दैनंदिन मजुरीदर वाढल्याने शेतक-यांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. तसेच मजुरीचे दर वाढल्याने मजुरही मिळेना, अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर आहे.

जमिनीत अजूनही ओलावा असल्याने पेरणी मंदावली आहे. बडीचा जोर वाढताच पेरणीचा देग वाढेल, हरभरा व गहू या पिकांना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. सिंचनासठी पाणी उपलब्ध आहे. मात्र, शेतकन्यांनी नियोजनपूर्वक पेरणी करावी, अशी प्रतिक्रिया अमरावतीचे जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली.

येत्या 23 नोव्हेंबरला शिक्षकांचीच होणार परीक्षा; TET मध्ये गुरुजींच्या बुद्धीमत्तेचा लागणार कस

Web Title: Sowing for the rabi season delayed ultivation done on only 5000 hectares chickpea area increased in rabi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Farmers

संबंधित बातम्या

जंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या; जतमध्ये व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने खळबळ
1

जंतराव ढापलेला साखर कारखाना परत द्या; जतमध्ये व्यंगचित्रात्मक पोस्टरबाजीने खळबळ

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळणार लवकरच! त्यासाठी कशी करणार e-kyc
2

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळणार लवकरच! त्यासाठी कशी करणार e-kyc

Amaravati News : निवडणुकीत महिलांना संधी; ४० नगरपरिषदा आणि ५ नगर परिषदांमध्ये निवडणुका
3

Amaravati News : निवडणुकीत महिलांना संधी; ४० नगरपरिषदा आणि ५ नगर परिषदांमध्ये निवडणुका

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी
4

Purandar Airport: ‘जमीन संपादनासाठी प्रति एकर १ कोटी रुपये स्वीकारार्ह नाही,’ शेतकऱ्यांनी केली जास्त नुकसानभरपाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.