पूर्वी शेताच्या अगदी मध्यभागी जाऊन नोंद करावी लागत होती. आता या नियमात शिथिलता आणत २० मीटरच्या अंतरातूनही पीक पाहणी करता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
शेतशिवारात वन्य प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. वनविभागात गेल्या एका वर्षात पिकांच्या नुकसानीपोटी सुमारे ६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या 'ब' गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. 'क' गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला.
अमरावती शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी राहिली. आगामी पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास हे धरण लवकर भरून…
जल जीवन मिशनअंतर्गत कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे मानधन थकीत असताना, खाजगी संस्थांची देयके मात्र वेळेवर अदा केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या प्राधान्यक्रमावर…
अकोला, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले तरी मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टैंकर चालवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. या धान्यामध्ये दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
८८ शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे. सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभअधिक वैगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे.
जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्ग व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रच वाटप करण्याच्या निर्णयासोबतच पुरवठा विभागाने रेशन लाभार्थ्यांना मोफत साड्या वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रती रेशन कार्ड एक साडी या प्रमाणात हे वाटप होणार आहे.
पिकांच्या कर्जदरात सरासरी १२ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासननिर्णय अद्याप निघालेला नसल्याने यंदा पीककर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित करता आलेले नाही.
अमरावतीची पाणीपुरवठा योजना आर्थिक तोट्यात जाऊन भविष्यात या क्षेत्राचे खाजगीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या ४२७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
Sant Gadge Baba Amravati University च्या यजमानपदाखाली झालेल्या All India Inter-University Softball Championship मध्ये मुला आणि मुलींच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले.
मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डीजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला तिथे साधी फोन ला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे.
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान तालुकास्तरावरील प्रश्नपत्रिका कस्टडीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केल्याने त्यांच्या नियमित अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला.
२ मार्चला होळी आणि ३ मार्चला रंगपंचमी साजरी होणार असल्याने बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाइनच्या सुरक्षित पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.
महाराष्ट्रातील तब्बल 16,981 ऑफीसमधून 24 तास वीजपुरवठा खंडीत होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी २४ तासांसाठी वीज खंडित केला जाईल. महाराष्ट्रातील ही कोणती ऑफीस आहेत? जाणून घ्या सविस्तर बातमी...