
Students hunger strike at Jawahar Navodaya Vidyalaya to cancel Principal Suresh Gawli transfer
Hingoli News : वसमत : येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी (दि. २२) अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण प्रसंग पाहायला मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, या मागणीसाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्याथ्यर्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. विद्याथ्यर्थ्यांनी वसतिगृहाच्या आवाराचे गेट बंद करून स्वतःला कोंडून घेतले होते. “बदली रद्द झाल्याशिवाय पाणीही पिणार नाही, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. (Hingoli News)
येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी (दि. २२) अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण प्रसंग पाहायला मिळाला. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गवळी यांची झालेली तडकाफडकी बदली रद्द करावी, या मागणीसाठी इयत्ता सहावी ते बारावीच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
हे देखील वाचा : जिल्हाधिकाऱ्यांचे शैक्षणिक सफाई अभियान; कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन तासांची झाडाझडती
आश्वासनानंतर आंदोलन मागे
वरिष्ठ स्तरावर बदलीच्या विषयावर सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन देत प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पालकवर्गालाही परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यात आले. अखेर प्रशासन, पालक आणि प्राचार्याच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेत गेट उघडले.
विद्यार्थ्यांच्या भावनांना मिळाला योग्य न्याय
आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव करून देण्यात आली, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने संयम व संवादाचा मार्ग अवलंबत परिस्थिती हाताळली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत शांततामय मागनि तोडगा काढण्यात यश आल्याने परिसरात दिलासा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांचे लक्ष आता वरिष्ठाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भावना वरिष्ठ स्तरावर पोहोचविण्यात येतील व शासनाकडे निवेदन पाठविण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. उशिरापर्यंत चर्चेचे सत्र सुरू होते.
हे देखील वाचा : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतीबाबत मोठा निर्णय; आता सरपंचच असणार…
प्रशासनाची तातडीची हालचाल
पथक घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तत्काळ प्रशासकीय घटनास्थळी पाठवले. औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे व वसमतचे नायब तहसीलदार विनोद डोणगावकर यांनी विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी व व्यवस्थापनाशी चर्चा
सुरू केली. दरम्यान, वाशिम व परभणी येथील जवाहर नवोदय विद्यालयांचे प्राचार्यही वसमत येथे दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले, सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहे.