Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी सोमवारी ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 26, 2025 | 04:37 PM
हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • आवश्यक परवाना न घेता ऊसाचे गाळप
  • हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यावर दंडाची कारवाई
  • सव्वा 11 कोटींचा आकारला दंड
इंदापूर : साखर आयुक्तालयाकडून आवश्यक गाळप परवाना प्राप्त होण्यापूर्वीच ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी सोमवारी ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला आहे.

राज्यात सन २०२५–२६ या ऊस गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊसगाळप करण्यासाठी साखर उत्पादकांनी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही संबंधित कारखान्याने परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचे साखर आयुक्तालयाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

गाळप परवान्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाकडून सर्व साखर कारखान्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने २० ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांकडे ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच कारखान्याने ऊसगाळप सुरू केल्याचे निदर्शनास आले.

नियमभंगाच्या काळात गाळप

या नियमभंगाच्या काळात कारखान्याने एकूण २ कोटी २४ लाख २९९ टन उसाचे गाळप केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशानुसार प्रति टन ५०० रुपये या दराने दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार कारखान्यावर एकूण ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक

लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथे सहा शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळून खाक होऊन दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असतानाच बुधवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरात अडीच एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत संपत महादेव गुजर या शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ते सुरतपट्टीलगत शेती करणारे शेतकरी आहेत. गुजर यांनी अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांतच ऊस तोडणीला येणार असल्याने हाच ऊस त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. मात्र, एका क्षणात संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने गुजर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

Web Title: Sugar commissioner has imposed a fine on harshvardhan patils factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Farmers
  • Harshvardhan Patil
  • Sugarcane

संबंधित बातम्या

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान
1

कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली
2

Farmers News: …म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.