ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.
एका बाजूला पावसाच्या अनिश्चिततेमुळे ऊसाचे उत्पादन घटले तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार करत असलेल्या काटामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
जुन्या गाड्यांमध्ये फ्युएल इंजेक्टर, पंप व सील्सहे तांबे, पितळ किंवा जुन्या रबरपासून बनलेले असल्याने इथेनॉलमुळे ते पटकन गंजतात किंवा खराब होतात. इथेनॉल पाणी शोषून घेतो, त्यामुळे गंजण्याची प्रक्रिया आणखी वेगाने…
सरकारने ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत.
ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून…
कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या मुदतीत एफआरपी रक्कम न दिलेल्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठवल्या आहेत. संबंधित कारखान्यांकडून 246 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे.
राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची ७ हजार कोटी रूपयाचे एफआरपी थकीत आहे. यामुळे संबधित साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट येथे बंद दाराआड चर्चा केल्याने जयंत पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जयंत पाटलांसोबत झालेल्या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.