Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीतील आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

न्यायालयाने ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यास ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार असून, निवडणुकाही लांबण्याची शक्यता आहे. याचा नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 25, 2025 | 09:18 AM
आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाची नाराजी; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करत निवडणुका रोखण्याचा इशारा दिला. त्यामुळे निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, न्यायालयाने ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यास ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार असून, निवडणुकाही लांबण्याची शक्यता आहे. याचा नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे साडेतीन, ४ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झाल्या नाही. राज्य सरकारने कायद्यात केलेली दुरुस्ती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण कायम केले.

त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर जाता कामा नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. परंतु निवडणूक आयोगाने ओबीसी वर्गासाठी जागा निश्चित करण्यासाठी दिलेल्या फॉर्म्युल्यामुळे अनेक जिल्ह्यात आरक्षण ५० टक्क्यांवर जात आहे.

हेदेखील वाचा : BMC land lease: मुंबई पालिका भूखंड भाडे तत्वावर देणार! उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कसली कंबर; करारातून किमान २०० कोटींची होणार कमाई

दरम्यान, यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त केली. ५० टक्क्यांवर आरक्षण गेल्यास निवडणुका रोखण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. यावर राज्य निवडणूक आयोगालाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. त्यावर न्यायालयाचा निर्णय अवलंबून असणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांवर होणार थेट परिणाम 

५० टक्क्यांवर गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने राबवण्याचा निकाल आल्यास त्याचा नगर पंचायत व नगर परिषदांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार आहे. नव्याने प्रक्रिया राबविल्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्याचप्रमाणे ओबीसीमधील जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून नव्याने महिला आरक्षण निश्चित करावे लागेल.

Web Title: Supreme court unhappy with reservation going up to 50 percent attension on election commissions role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • State Election Commission
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य
1

‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य
3

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video
4

‘मोदी, शाह की कब्र…’; JNU मध्ये डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची घोषणाबाजी, पहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.