Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : पुन्हा एकदा इर्शाळवाडी ? कल्याणमध्ये पावसामुळे माती खचल्याने भिंत कोसळून घरांचे नुकसान

कल्याण पूर्व भागातील कचोरे परिसरात एका टेकडीवरील सहा घरांची भिंत कोसळली. स्थानिक नागरीकांना घटनेची माहिती मिळताच स्वत: घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 27, 2025 | 05:47 PM
Thane News : पुन्हा एकदा इर्शाळवाडी ? कल्याणमध्ये पावसामुळे माती खचल्याने भिंत कोसळून घरांचे नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण: कल्याण पूर्व भागातील कचोरे परिसरात एका टेकडीवरील सहा घरांची भिंत कोसळली. स्थानिक नागरीकांना घटनेची माहिती मिळताच स्वत: घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. आजूबाजूच्या रहिवासियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे माती खचल्याने ही घटना घडली आहे.

इर्शाळवाडी, माळीण आणि अशा कितीतरी घटना घडल्या असून देखील स्थानिक प्रशासन  या अशा दुर्घटनांकडे कसं काय दुर्लक्ष करतात हा प्रश्न कायम आहे.  कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात देखील इर्शाळवाडी आणि माळीणसारखी दुर्घटना होता होता राहिली आहे.  कचोरे परिसरातील टेकडीवर लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे माती खचल्याने येथील एका घराची भिंत कोसळली. कचोरे गावातील नागरीकांनी  या घरांच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना घराबाहेर काढण्यास मदत केली. प्रसंगावधान राखत नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. सुदैवाने ज्या घराची भिंत कोसळली ते घर आणि इतर पाच अशी सहा घरं रिकामी होती.  ज्या घरांची भिंत कोसळली त्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु केले. ही घटना कळताच टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्यासह महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली.

बारामतीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांसह २ मुलींचा जागीच मृत्यू

घटनेची पाहणी करुन त्याठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. महापलिकेच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले, पावसाळ्यात आम्ही टेकडीवर राहमाऱ्या नागरीकाना सूचना देतो. ज्या भिंत कोसळली. त्याठीकाणी कोणी राहत नव्हते. स्थानिक नागरीकांनी पुढाकार घेऊन कोसळलेल्या घरांना जमीनदोस्त करण्याचे काम सुरु आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस पडत आहे. या पावसामुळे माती खचली त्यामुळे घराची भिंत कोसळून ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला लोकशाहीचा अनुभव! एक अनोखी संकल्पना… मुख्यमंत्री मुलीचा आनंद पहाच!

याआधी देखील तीन वर्षांपूर्वी याच भागात दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी 104 कुटुंबियांना तात्काळ घरं खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. तशी नोटीस जारी करण्यात आली होती. यावेळी देखील पुन्हा तशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

Web Title: Thane news houses damaged due to wall collapse due to soil erosion due to rain in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • kalyan
  • Thane news

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…
1

Maharashtra Rain Alert: काही दिवस रेनकोट घालूनच फिरा! महाराष्ट्रावर येणार भयंकर संकट, तीनही बाजूंनी…

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
2

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
3

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच
4

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.