
दिल्लीतील हवामनात बदल होण्याची शक्यता
काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता
आयएमडीने नागरिकांना दिल सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली: देशातील हवामानात सध्या बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आयएमडीने याबाबत इशारा दिला आहे. हिंद महासागर आणि आणि बंगालच्या उपसागरात मध्यभागी हवेचा चक्रवर्ती प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील अनेक भागात हवामान बदलणार असल्याचे सांगितले गेले आहे. दरम्यान आयएमडीने काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टि, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 18 फेब्रुवारीला आणि उत्तराखंडमध्ये 18 आणि 19 तारखेला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
17 आणि 18 फेब्रुवारी रोजी पंजाब, चंदीगड, राजस्थान, हरियाणा राज्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 30 ते 40 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आयएमडीचा इशारा काय?
उत्तर पश्चिम भारतात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊ शकते. त्यामध्ये काही दिवस बदल होऊ शकतात. पूर्वोत्तर भारतात पुढील तीन ते चार दिवसांत कोणताही बदल होण्याचा अंदाज नाही.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाड्याची चाहूल लागली आहे, किमान तापमानातही चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाच्या झळा अधिक जाणवण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल व किमान तापमानात सातत्याने बदल होत असून शुक्रवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली.
Rantgiri जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा ३३ अंशावर
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले. कुलाबा केंद्रात कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यापेक्षा ३.३ अंशांनी जास्त होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात मुंबईसह कोकण पट्टधात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.