Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Climate Change : बदलत्या हवामानामुळे आजार वाढले; ‘ही’ आहेत कारणे

अलीकडील बदलत्या हवामानामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री गारवा यामुळे सर्दी, ताप, खोकला व अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2025 | 12:25 PM
बदलत्या हवामानामुळे आजार वाढले; 'ही' आहेत कारणे

बदलत्या हवामानामुळे आजार वाढले; 'ही' आहेत कारणे

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : अलीकडील बदलत्या हवामानामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री गारवा यामुळे सर्दी, ताप, खोकला व अतिसार यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. गेल्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. परिणामी, उपजिल्हा रुग्णालयात दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या १०० वरून १५० पर्यंत पोहोचली आहे.

सध्याच्या हवामानात विषाणूजन्य आजार झपाट्याने पसरतात. हे आजार श्वसनसंस्थेवर व पचनसंस्थेवर परिणाम करतात. वाढत्या उष्णतेने उष्माघाताची शक्यता असून मळमळ, उलटी, डोकेदुखी, त्वचा गरम होणे, थकवा, चक्कर आणि डिहायड्रेशन ही लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघाताचा धोका

उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका आहे. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याची शक्यता असल्याने उष्माघातासारख्या परिस्थितीतून वाचण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन आराेग्य तज्ज्ञांनी केले आहे.

लक्षणे काेणती?

मळमळ, उलटी, थकवा येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

सध्याचे बदललेले वातावरण नागरिकांच्या आरोग्यास त्रासदायक ठरत आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तातडीने उपचार घ्यावेत. विषम वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वातावरण बदलामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. स्वच्छ आणि भरपूर पाणी प्यावे. -डॉ. आनंद गवळी, कासेगाव

काय काळजी घ्याल?

बाहेरचे खाणे, विशेषतः हॉटेल्स, किंवा फूड स्टॉल्सवर तयार केलेले पदार्थ स्वच्छतेच्या बाबतीत अनिश्चित असू शकतात. म्हणून बाहेरचे खाद्यपदार्थ टाळावेत. दिवसभरातील उष्णतेमुळे मुलांचे शरीर डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे मुलांना उन्हात फिरायला पाठवू नये. मुलांचा आहार पोषणतत्त्वांनी समृद्ध असावा. प्रोटीन, व्हिटॅमिन सी, आयर्न आणि फायबर असलेले पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करा.

Web Title: The number of patients in hospitals has increased due to an increase in diseases due to changing weather conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Hospital News
  • Solapur News
  • summer heat

संबंधित बातम्या

Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी
1

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक
2

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत
3

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार
4

पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.