
राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा
किडनीविकारांचे प्रमाण वाढत असताना आणि डायलिसीससारख्या उपचारांची गरज सातत्याने वाढत असतानाच राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांमधील सहा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नवीन डायलिसीस युनिट्स सुरू करण्यात आली असून, त्यामुळे किडनी विकारग्रस्त रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार व परवडणारी सेवा मिळणार आहे. यामुळे उपचारांसाठी दूरच्या महानगरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बदलती जीवनशैली यांमुळे किडनीविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक व दुय्यम आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीससारख्या सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आणखी जिल्ह्यांमध्ये अशा युनिट्स सुरू करण्याचा आराखडा असून, किडनी रुग्णांसाठी परवडणारी उपचारव्यवस्था उभा राहील.
आतापर्यंत अनेक जिल्ह्यांतील रुग्णांना डायलिसीससाठी शेजारच्या जिल्ह्यात किंवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचा खर्च, उपचारांचा वाढता आर्थिक भार आणि वेळेचा अपव्यय अशी त्रिकूट समस्या निर्माण होत होती. नव्याने सुरू झालेल्या या युनिट्समुळे रुग्णांना स्थानिक पातळीवरच नियमित डायलिसीस सुविधा उपलब्ध होणार, ज्याचा थेट फायदा ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना होणार आहे. या डायलिसीस युनिट्समध्ये आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना, स्वच्छता मानके आणि उपचार प्रोटोकॉल काटेकोरपणे राबवले जाणार आहेत.
Rohit Pawar PC: ‘हा घातपात असू शकतो अशी मला शंका..; रोहित पवारांना संशय
ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना थेट लाभ, आधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित उपलब्धता मनुष्यबळाची, सुरक्षितता व स्वच्छतेचे मानक प्रोटोकॉल लागू, भविष्यात आणखी जिल्ह्यांत डायलिसिस युनिकसुरु करण्याचा आराखडा करण्यात आला आहे.