Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाकळी बायपास ते अनवली रस्ता गेला खड्ड्यात…; रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघाताला निमंत्रण

सोलापूरमध्ये रस्त्यांची दुराव्यस्था झाली असल्याचे समोर आले आहे. टाकळी बायपास ते अनवली रस्त्याची चाळण झाली असून खड्डे झाले आहेत

  • By प्रीति माने
Updated On: Sep 16, 2025 | 07:03 PM
The road from Takali bypass to Anavali is in poor condition and has potholes

The road from Takali bypass to Anavali is in poor condition and has potholes

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तुफान पावसामुळे काही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याचा फटका नागरिकांना आणि खास करुन जेष्ठ नागरिकांना बसत आहे. पंढरपूरातील रस्ते देखील खड्डेमय झाले असल्याची अवस्था आहे. टाकळी बायपास ते अनवली या रस्त्याची खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.

कर्नाटकातून जड वाहतूक महाराष्ट्र राज्यातील पुणे, नगर, सातारा, मुंबई तसेच राज्यातील बरेच ठिकाणी जाण्यासाठी जड वाहतूक आणि या परिसरातील ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. टाकळी बायपास ते अनवली या दोन गावांमधील अंतर सुमारे दहा किलोमीटरचे आहे. मात्र, दोन्ही गावच्या हद्दीवरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकवेळा छोटे मोठे अपघात होत आहेत. मध्यंतरी ठेकेदाराकडून खड्डे बुजवण्यात आले होते परंतु ते खड्डे अर्धवटच सोडून दिले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

खड्डे बुजवण्याचे हे काम झाल्यानंतर रस्त्यावर वरच्यावर माती टाकून, तसेच सोडून दिलेले आहे. यामुळे या ठिकाणी वाहने जाऊन मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच, या रस्ता अरुंद असल्यामुळे टाकळी बायपास ते अनवली रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्यात यावेत यासाठी ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यास कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे .

कासेगाव व टाकळी ग्रामस्थ

टाकळी बायपास ते अनवली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती व रुंदीकरण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा द्यावा लागेल असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.  दोन वाहने समोरासमोर आली तर खाली कोणी उतरायचे यावरून वाहनचालकांमध्ये अनेकवेळा वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण लवकरात लवकर करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वाघबीळ – पन्हाळा रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन

पन्हाळ्यामध्ये देखील रस्त्याची दुराव्यस्था झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस सार्वजनिक बांधकाम खात्याकडून डागडुजीच्या नावाखाली केलेल्या निकृष्ट कामामुळे व सध्या दुरवस्थेत अडकलेला वाघबीळ-पन्हाळा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पन्हाळा व परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

शनिवार – रविवार व सुटीच्या दिवशी पन्हाळ्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे सुटीच्या दिवशी, पर्यटकांच्या इतर दिवशी तालुक्याच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वर्दळ असते; परंतु रस्ता खराब असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात येथे झालेल्या चिखलाचे पाऊस उघडल्यानंतर धुळीत रूपांतर होते. प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम मात्र झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, जिल्हाधिकारी यांना प्रती पाठविल्या आहेत.

Web Title: The road from takali bypass to anavali is in poor condition and has potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • daily news
  • Pandharpur News
  • Solapur News

संबंधित बातम्या

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर
1

AI Technology : प्रयोगशाळांमध्ये ठरणार युद्धांचे भविष्य; लष्करी-नागरी समन्वयावर तज्ज्ञांचा भर

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी
3

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट
4

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.