Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०११ सालच्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी राज्य सरकारची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

अकरा वर्षांपूर्वी १३ जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 05, 2022 | 10:11 PM
२०११ सालच्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी राज्य सरकारची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वर्षांनुवर्ष सुरू असलेले महत्वाचे खटले विशिष्ट कालावधीत निकाली काढण्यास ताण येत असल्याचे स्पष्ट करत झवेरी बाजार, दादर आणि ऑपेरा हाऊस येथील २०११ तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची राज्य सरकारची मागणी विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच या अती महत्वाच्या खटल्यांवर प्रभावी कामकाज आणि ठोस प्रयत्न करण्यास सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही न्यायालयाने सरकारवर केली.

या अती महत्वाच्या खटल्यावर दैनंदिन सुनावणी घेण्याची विनंती करणारा अर्ज सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात केला होता. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी तिहेरी बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यास नकार दिला.

कातडी वाचवण्याचा प्रयत्न

आधीच्या न्यायाधीशांनीही या खटल्यात जलदगतीने पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यास सांगितले होते. मात्र, तसे असूनही खटला पुढे नेण्यासाठी सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. तसेच सरकारचा अर्ज पाहता येथे प्रत्येकजण कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात न्यायालयाने खडेबोलही सुनावले आणि अन्य प्रकरणाच्या ताणामुळे महत्वाच्या खटल्यावर दररोज सुनावणी शक्य होणार नाही, असे स्पष्ट करत राज्य सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण

अकरा वर्षांपूर्वी १३ जुलै २०११ रोजी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट झाले होते. त्यात २६ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले होते. जानेवारी २०१२ मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरारी आरोपी यासीन भटकळ हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: The special court rejected the state governments demand in the 2011 triple bomb blast case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 10:11 PM

Topics:  

  • Bomb Blast Case
  • Mumbai
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर
1

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा
2

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
3

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.