Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी ! पर्यटकांना मिळणार तीन दिवसांची टोल माफी; ‘इथं’ घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

तब्बल 20 ते 22 वर्षांनी होत असलेला हा पर्यटन उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी याची संपूर्ण जबाबदारी संभाजीनगर येथील ई-फॅक्टर या खाजगी इव्हेंट कंपनीला देण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 13, 2025 | 12:15 PM
राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी टोलमाफी जाहीर; 'या' कालावधीत मिळणार टोलमधून सूट

राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी टोलमाफी जाहीर; 'या' कालावधीत मिळणार टोलमधून सूट

Follow Us
Close
Follow Us:

महाबळेश्वर : पर्यटन विभागाच्या वतीने 2 ते 4 मे दरम्यान होत असलेल्या महापर्यटन उत्सवात सहभागी होत असलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व वाहनतळ फी माफ करण्यात आल्याची माहिती वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कच्चरे यांनी महाबळेश्वर येथे दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरीष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंतराव हेडे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाबळेश्वर या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावा, यासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पर्यटन उत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या महा पर्यटन उत्सवाची शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.

तब्बल 20 ते 22 वर्षांनी होत असलेला हा पर्यटन उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी याची संपूर्ण जबाबदारी संभाजीनगर येथील ई-फॅक्टर या खाजगी इव्हेंट कंपनीला देण्यात आली. या उत्सवातील कार्यक्रमाचे सादरीकरणासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरीकांची एक बैठक वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील मधुबनच्या सभागृहात अयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी टोल माफ करण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी उपस्थित नागरीकांशी संवाद साधताना राजेंद्र कचरे म्हणाले की, ‘हा महापर्यटन उत्सव स्थानिक नागरीकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही. म्हणून या उत्सवाची संपूर्ण माहिती देणे व त्याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे व कार्यक्रमात आवश्यक ते बदल करण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करतो, असे स्पष्ट करून कचरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

महापर्यटन उत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र या बरोबरच सोशल मीडिया यांचाही वापर करण्यात येणार आहे. टॅक्सी व लक्झरी बसेसवर जाहिरात करणारे स्टिकर्स लावण्यात येतील. शहरातील प्रत्येक प्रवेशव्दारावर मोठमोठ्या कमानी उभारल्या जातील. त्याचप्रमाणे मुंबई-बंगलोर व मुंबई-गोवा या महामार्गावर होर्डिंग्ज लावले जातील. हॉटेलमधील स्वागत कक्षात उत्सवाची कार्यक्रम पत्रिका लावली जाईल, तीन दिवस आलेल्या पर्यटकांना एक कीट देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

Web Title: Tourists will get three day toll waiver in mahabaleshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप
1

Satara News : खादीच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी व्हावं; कावडी येथे महिला व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा समारोप

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल
2

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ;  श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं
3

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ; श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य
4

Maharashtra Politics: ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.