Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला; बेशिस्त ऊस वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

शिरूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवरून जाणाऱ्या अवजड ऊस वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 17, 2024 | 12:38 PM
शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला; बेशिस्त ऊस वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला; बेशिस्त ऊस वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शिरूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवरून जाणाऱ्या अवजड ऊस वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. उंचच्या उंच भरलेले उसाचे ट्रक, बेशिस्त वाहनचालकांची बेफिकीर वागणूक आदींमुळे अष्टविनायक महामार्ग व परिसरातील रस्ते अपघातांचे केंद्र बनत आहेत. याकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून अत्यंत अवजड प्रमाणात ऊस वाहून नेला जात आहे. मलठण व कवठे येमाई येथील आठवडे बाजार रस्त्याच्या लगतच भरत असल्याने या दिवशी नागरिकांना जीव मुठीत घेऊन भाजीपाला खरेदी करावा लागतो. नियमानुसार ऊस वाहतूक करताना ट्रकच्या उंची आणि वजनाला मर्यादा असतानाही संबंधित मालक व चालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच प्रशासनाकडून कारवाई न करता सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

रस्ता ओलांडताना धोका निर्माण

तालुक्यातील ग्रामीण भागात खुलेआम सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय हा रस्ते सुरक्षेवर मोठा परिणाम करत आहे. मद्यधुंद वाहनचालक रात्री-अपरात्री बेशिस्तपणे वाहने चालवतात. यामुळे स्थानिक नागरिकांना रात्री प्रवास करताना किंवा रस्ता ओलांडताना धोका निर्माण होत आहे. शिरूर शहर व ग्रामीण भागातील अवजड ऊस वाहतूक, अवैध दारू व्यवसाय, बेशिस्त मद्यधुंद वाहनचालक यांमुळे अपघाताच्या घटना वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

मद्यधुंद वाहनचालकांमुळे अनेक अपघात

  • रस्त्यांवरून गाड्या चालवताना दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
  • ट्रक उसाने इतके ओसंडून भरलेले असतात की, मागील बाजूने तोल जाऊन ऊस रस्त्यावर पडण्याचा धोका असतो.
  • अलीकडच्या काही दिवसांत अशा गाड्यांमुळे व मद्यधुंद वाहनचालकांमुळे अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे.
  • शाळेतील मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना सावधानता बाळगत प्रवास करावा लागत आहे.
  • सायंकाळच्या वेळी परिसरातील हॉटेल परिसरात गर्दी असते. व मद्यधुंद वाहनचालक बेशिस्त वाहने चालवताना दिसून येतात.

रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी

पोलिसांनी गस्त वाढवून मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करावी. अवैध दारू व्यवसायावर कठोर पावले उचलावीत. ऊस वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे. उसाच्या अधिक वजन व उंचीच्या गाड्यांवर कारवाई करावी. प्रशासनाने रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे तपासून रस्त्याची सुधारणा करावी, आदी मागण्या परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत.

Web Title: Unruly sugarcane traffic in shirur has increased the risk of accidents nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 12:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shirur Police

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.