
Vegetables
हिंगणा : सध्या महागाई मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. त्यात भाजीपाला देखील चांगलाच महाग झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भाजीपाला देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. ज्यादा भाव देऊनही चांगला भाजीपाला मिळत नसल्याची चर्चा आहे.
हिंगणा येथे पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत. भाजीपाल्याचे उत्पादनही कमी झाल्याने अनेक भाज्या बाजारातून गायब झाल्या आणि ज्या उपलब्ध आहेत, त्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले. येथे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून, गरिबांच्या ताटातून डाळीही गेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी महागाई आहे. अशा परिस्थितीत गरिबांनी काय खावे हा मोठा प्रश्न आहे. टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, वांगी 40 ते 50 रुपये किलो, कोथिंबीर 150 ते 180 रुपये, फ्लॉवर 150 ते 160 रुपये किलो आहे.
आता पाऊस सुरू झाला आहे. तरीही पुढील 2 महिने भाज्यांचे भाव कमी होणे शक्य नाही. भाज्यांचे वाढलेले दर पाहता बाजारपेठेतील ग्राहकही कमी झाले आहेत. बाजारात जाण्यासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे गरीब, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.