Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातल्या 12 गावांवर पाणीटंचाईचं सावट ; पाणीपुरवठा विभागाने सादर केला अहवाल

प्राप्त अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2025 | 07:08 PM
कोकणातल्या 12 गावांवर पाणीटंचाईचं सावट ; पाणीपुरवठा विभागाने सादर केला अहवाल
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्गनगरी/ संजय वालावलकर :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी 12 गावं आणि 302 वाड्यांचा समावेश आहे. यासाठी 5 कोटी 78 लाख 95 हजार रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम दरवर्षी हाती घेतली जाते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही. त्यामुळे या मोहिमेबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते . सद्यस्थितीत हवामानातील बदल आणि वाढलेला उष्मा पाहता पाण्याची पातळी घटून जिल्ह्यातील काही गाव व वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Government : 100 दिवसात पुढच्या 25 वर्षांचा आराखडा तयार; महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाची अव्वल कामगिरी

याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.प्राप्त अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

कर्जतमध्ये धरणग्रस्तांचे साखळी उपोषण सुरू; पाणी विकण्यास शेतकऱ्यांचा विरोध

या आराखड्यामध्ये नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती करणे १२ गावे २४ वाड्यांसाठी ३ कोटी ३५ लाख, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे ३३ वाड्यांसाठी ९ लाख ८० हजार, नवीन विंधन विहीर घेणे १२५ वाड्यांसाठी १ कोटी २५ लाख, तात्पुरती पूरक नळ योजना घेणे १२ वाड्यांसाठी ५६ लाख ५० हजार, विहीर खोल करणे गाळ काढणे विहीर दुरुस्त करणे १०८ वाड्यांसाठी ५२ लाख ६५ हजार, अशा प्रकारे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची शक्यता असलेल्या १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Water shortage looms over 12 villages in sindhudurg water supply department submits report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • Kokan News
  • Sindhudurg District
  • water issues

संबंधित बातम्या

Ratnagiri News : नसतं धाडस बेतलं जीवावर; पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
1

Ratnagiri News : नसतं धाडस बेतलं जीवावर; पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…
2

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…

रत्नागिरी जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश; विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
3

रत्नागिरी जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश; विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

तळकोकणात ‘ओंकार’ पाठोपाठ ‘राजा’चा तूफान धुमाकूळ; उपद्रव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत
4

तळकोकणात ‘ओंकार’ पाठोपाठ ‘राजा’चा तूफान धुमाकूळ; उपद्रव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.