Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

कंपनीसाठी लागणारा काही कच्चा रासायनिक माल उघड्यावर ठेवण्यात येत असून, पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घटक मिसळलेले सांडपाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोअरवेलवर होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2026 | 11:21 AM
माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

Follow Us
Follow Us:

म्हसवड : माण तालुक्यातील पानवन हद्दीतील मुरुमशेंडा वस्ती परिसरातील केमिकल कंपनीच्या सांडपाण्यामुळे पाणीस्रोत दूषित होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, लहान मुले, महिला, पुरुष तसेच अपंग नागरिकांच्या शरीरावर जखमा व त्वचेच्या समस्या निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही जनावरांचा मृत्यू झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणाची गंभीरता ग्रामपंचायत पानवनच्या अधिकृत नोटिशीमुळे आणखी वाढली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र पुळकोटी यांच्या माध्यमातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये मुरुमशेंडा तलावानजीकची विहीर, दिलीप बाबा काळेल यांची खासगी विहीर, मारुती गुंडा नरळे यांची विहीर आणि हेमा शिवाजी नरळे यांची विहीर अशा चारही पाणीस्रोतांचे नमुने पिण्यास अयोग्य आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या स्रोतांतील पाणी पिण्यास वापरू नये, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीसाठी लागणारा काही कच्चा रासायनिक माल उघड्यावर ठेवण्यात येत असून, पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घटक मिसळलेले सांडपाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोअरवेलवर होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिकांचे आरोग्य आणि जनावरांचे जीवन धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही पाण्याचे नमुने तपासून शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.

दरम्यान, महिलांनी कंपनी व्यवस्थापना विरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडेही तक्रार केली आहे. ग्रामस्थ महिलांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे तसेच भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.

प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार? 

नागरिकांचे पाणी, आरोग्य आणि जनावरांचे जीव धोक्यात असल्याचे आरोप होत असताना प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार? असा संतप्त सवाल मुरुमशेंडा ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची संयुक्त व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना तातडीने सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

पाणी आमचा मूलभूत अधिकार; विषारी पाणी नको

मुरुमशेंडा परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे स्वतंत्र नमुने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत निश्चित करावा, नागरिकांच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधित कंपनीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दहीहंडीच्या उत्साहाला AI चा तडका ! Google Gemini च्या मदतीने क्षणातच बनवा सिनेमॅटिक ईमेज, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Web Title: Well and borewell water contaminated in murumshenda area man taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Man Taluka
  • Water Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.