१४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस करवाढ न करता सभागृहात मान्यता देण्याचा निर्णय झाला आहे. पक्ष बैठकीत नगरसेवकांनी एकमताने भूमिका घेतली असून लवकरच शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
जलसंपदा विभागाकडून पाणी कपातीबाबत सूचना मिळाल्यानंतर पुणे शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून, महापालिकेकडून पाणी बचतीसाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्र. २ अंतिम टप्प्यात असून, भूसंपादनातील अडथळे दूर करून कामांना गती देण्यात आली आहे. १०,८६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच उघडकीस आलेल्या या त्रुटीमुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडाली असून, चाचणी प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी किमान दोन दिवसांचा विलंब अटळ…
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलली आहेत.
महापौर समीर राजूरकर यांनी पदभार सांभाळताच दुसऱ्या दिवशी चिकलठाणा ते सिडको दरम्यान पाणी वितरणातील अडीअडचणी समजून घेतल्या. पाणी वितरणात असलेल्या त्रुटींची माहिती घेतली.
नाशिक शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते.
भूजल व्यवस्थापन हे केवळ एका विभागापुरते मर्यादित न राहता सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून होणे आवश्यक आहे. पाणी पुनर्भरण प्रकल्प आणि दीर्घकालीन जलधोरणांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
इगतपुरी शहरात दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ३८ कोटी रुपये खर्चुनही नागरिकांना दुषित पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार २०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे काम 'वॉर मोड'वर सुरू. २५ डिसेंबरपासून पाण्याची चाचणी सुरू होणार; मनपा निवडणुकीपूर्वी पाणीटंचाईचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न.
मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तीव्र निदर्शने केली.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.