Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरान शहरात हात रिक्षा चालकांना न्याय कधी मिळणार? शिवसेनेची मागणी

माथेरान शहरातील हात रिक्षा चालकांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 05, 2025 | 10:15 PM
माथेरान शहरात हात रिक्षा चालकांना न्याय कधी मिळणार? शिवसेनेची मागणी

माथेरान शहरात हात रिक्षा चालकांना न्याय कधी मिळणार? शिवसेनेची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

माथेरान हे ब्रिटिश काळापासून मानवाने मानवाला ओढण्याच्या अमानवीय प्रथेसाठी ओळखले जात होते. अनेक वर्षांपासून या प्रथेविरोधात सामाजिक संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवला जात होता. अखेर या लढ्याला यश मिळाले असून सर्वोच्च न्यायालयाने ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, हात रिक्षा ओढण्याची प्रथा पुढील सहा महिन्यांत थांबवून सर्व हात रिक्षा चालकांचे पुनर्वसन “ई-रिक्षा”च्या माध्यमातून करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.

या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने सातत्याने मागणी केली जात आहे. माथेरान शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी या संदर्भात पालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठामपणे मांडणी करत सांगितले की, “पर्यावरणपूरक ई-रिक्षा हे हात रिक्षा चालकांचे हक्क आहेत आणि शासनाने त्यांना न्याय मिळवून द्यावा.”

सध्या माथेरानमध्ये केवळ २० हात रिक्षा चालक ई-रिक्षा चालवत आहेत, तर उर्वरित ७४ चालक अजूनही हात रिक्षा ओढण्याचे कठीण काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या सर्व चालकांचे तात्काळ पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.

Navi Mumbai: नालायक शब्द तुम्हाला का झोंबला? सुरज पाटील यांची नरेश म्हस्केंवर टीका

या विषयावर झालेल्या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल पाठवला जाईल. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याच्या तयारीला गती दिली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाकडे यासंबंधी पत्र पाठवले आहे. तसेच टाटा सोशल सायन्सेस (TISS) या संस्थेकडून ई-रिक्षांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

या ई-रिक्षा भाडेतत्त्वावर न देता चालकांना मालकीहक्काने देण्याचा प्रस्तावही सध्या विचाराधीन आहे. मुख्याधिकारी इंगळे यांनी सांगितले की, “रिक्षा खरेदी आणि नियोजनाची प्रक्रिया सहा महिने न थांबवता शक्य तितक्या लवकर पूर्ण केली जाईल.”

खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’

शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक हात रिक्षा चालकांनी आपल्या शंका व अडचणी मांडल्या. त्यावर समाधानकारक चर्चा झाली असून पुढील टप्प्यात आमदार महेंद्र थोरवे माथेरानला येऊन या प्रकरणाचा सरकारी पातळीवर सविस्तर आढावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली.

शिवसेनेच्या भूमिकेनुसार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ माथेरानचाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील श्रमिकांच्या सन्मानाशी संबंधित आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत करून हात रिक्षा चालकांना न्याय देणे ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: When will hand rickshaw drivers in matheran city get justice shiv sena demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • Matheran

संबंधित बातम्या

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3  लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा
1

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3 लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘उत्तर’मधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!
2

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘उत्तर’मधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास  प्रतीक्षा, लांब रांगा
3

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास प्रतीक्षा, लांब रांगा

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी
4

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.