Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी मांडावं’; राजू शेट्टी यांचं विधान

शेतकऱ्यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला आहे. भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 11, 2025 | 11:47 AM
शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी मांडावे - राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी मांडावे - राजू शेट्टी

Follow Us
Close
Follow Us:

कराड : शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे, साहित्यिकांनी लिखाण करताना पुरस्कारासाठी न करता समाजाच्या हितासाठी करून त्यावरील उपाय देखील त्यामध्ये सूचित करावेत. तरच साहित्य अधिक समृद्ध होईल, असे माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित मराठी साहित्य संमेलनात ‘कृषक समाज काल आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजेपवार, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील, संचालक नितीन ढापरे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.डॉ. नितीन नाळे, राज्य उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला आहे. भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले. स्वामीनाथन, सुब्रमण्यम यांनी देशात हरितक्रांती आणली. शेतकऱ्यांनी समृद्धी आणली त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. साहित्यिकांनी शेतकऱ्यांचे चित्र योग्य पद्धतीने रंगवले नाही. गोरगरिबांचे शोषण करणारा, फेटा उडवणारा अशा पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात व चित्रपटात रंगवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडले पाहिजे’.

ते म्हणाले, ‘उत्पादन खर्च प्रतिदिन वाढत आहे. या उलट शेतकऱ्याचे उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शरद जोशी म्हणायचे, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण आहे. आसमानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करत असताना सरकार सुलतानी संकट शेतकऱ्यांवर लादत आहे. बाजार पेठ व उत्पादित मालाची नेमकी माहिती सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असेल तर सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत.

देशात शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक

डॉ. शरद गोरे म्हणाले, या देशात शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होत आहे. जात व धर्म ही व्यवस्था बोगस आहे. शेतकरी व बहुजन समाजाला दाबण्यासाठी प्रयत्न झाले. मराठी राजभाषा आहे. संस्कृत कधीही राजभाषा नव्हती. याचे कोणतेही संदर्भ साहित्यात आढळून येत नाहीत. महात्मा फुले यांनी सांगितले होते, सर्वात पहिली गुलामी वैचारिक केली जाते. ही व्यवस्था बदलण्यासाठी विचारवंतांना पुन्हा एकत्रित करावे लागेल.

Web Title: Writers should present the reality of farmers lives says raju shetti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

‘देशात मुदतपूर्व निवडणुका लागणार’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान
1

‘देशात मुदतपूर्व निवडणुका लागणार’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

सरकार काहीतरी मोठं करणार? OBC आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2

सरकार काहीतरी मोठं करणार? OBC आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’
3

Manoj Jarange Patil Live: ‘महावादळ’ थंडावले! मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण; आंदोलकांनी उधळला ‘जल्लोषाचा गुलाल’

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा
4

Manoj Jarange Patil Live: “… रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार”; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.