स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षांपासून निधीअभावी रखडला आहे.
सामान्य जनतेसाठी व शेतकरी वर्गासाठी लढणाऱ्या संघटनातील नेते बाहेर पडल्याने नेते मैदानात, कार्यकर्ते रिंगणात अशी अवस्था झाली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उभा राहिला आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन केले जाणार आहे. याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे.
‘पूर नियंत्रण, अलमट्टी पाणीपातळी, नुकसानभरपाई व नद्यांवरील पुलाचे अडथळे यांवर सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र जनआंदोलन उभारेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सदर प्रकरणाची गेल्या तीन महिन्यात सखोल चौकशी होणे गरजेचे होते. कारागृहात झालेल्या कॅंन्टीन , रेशन व इतर साहित्य उपकरणाच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अनुदान बाजूला राहिले, हमीभाव सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला 8 आत्महत्या होत आहे. बेजबाबदारपणे सरकार काम करत आहे. नंदनवन करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
शेतकऱ्यांच्या बाबतीत शासकीय व्यवस्थेची भावना बोथट झाली आहे. वर्षानुवर्षे शेतकरी अन्याय सहन करत आहेत. भारतीय संस्कृतीचा उदय शेतकऱ्यांपासून झाला आहे. भांडवलदाराने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम आजपर्यंत केले.
कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
सत्तेच्या चाव्या बहुजन समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
राष्टीय समाज पक्ष आयाेजित ‘युवा संघर्ष निर्धार परीषदे’च्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
अनेक साखर कारखान्यांकडून स्पेंट वॅाश , मळीमिश्रीत पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. इचलकरंजी शहरातील अनेक प्रोसेस धारकाकडून केमिकलयुक्त पाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे.
तहसीलदार चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न लातूर प्रतिबंधक विभागाने केल्याचा आरोप स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.