Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं हेच महायुती सरकारचं धोरण’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची टीका

लाडकी बहीण योजनेत अवघे १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, त्या बदल्यात महागाईने लुटण्याचे काम सुरु आहे. या वाढलेल्या महागाईला जबाबदार कोण? हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2024 | 01:34 PM
Internal Dispute will increase in the Congress in the Assembly elections

Internal Dispute will increase in the Congress in the Assembly elections

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल, डाळी व अन्य किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे खुश झालेल्या महिला वर्ग भडकला असून, आम्ही सणवार साजरे करायचे नाही?, असा प्रश्न लाडक्या भावांना विचारताना पाहायला मिळत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हेच महायुती सरकारचे धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “गणेशोत्सव, नवरात्र आणि आता दिवाळीचा सण तोंडावर आहे. खाद्यतेलाने दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डाळी, साखर, गूळ, खोबरे, कांदा बटाटा मैदाकांदा-बटाट्याने भाव खाल्लेला आहे. सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा स्वरूपाचे हे भाव गेल्या चार-पाच महिन्यात वाढले आहेत’.

तसेच महागाईचा आगडोंब उसळलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मात्र गुलाबी जॅकेट घालून मोठमोठे कार्यक्रम घेऊन, प्रसिद्धीचा मारा करून लाडकी बहीण खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजनेत अवघे १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र, त्या बदल्यात महागाईने लुटण्याचे काम सुरु आहे. या वाढलेल्या महागाईला जबाबदार कोण? हा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पैशांचे आमिष दाखवून केली जातीये कोट्यवधींची उधळपट्टी

तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काम करण्याऐवजी हजार-पंधराशे रुपयांचे आमिष दाखवून त्याच्या प्रसिद्धीवर कोट्यवधींची उधळपट्टी सध्या राज्यात सुरु आहे. योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या सर्वात सामान्य जनता होरपळून निघत असून, त्यांना दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Youth congress leader prathamesh abnave criticized on government on various issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 01:34 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Dhule News: धुळ्यातील ४ सरकारी रुग्णालयांचा कायापालट; १५.७२ कोटींतून उभारणार ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा’ दवाखाना
1

Dhule News: धुळ्यातील ४ सरकारी रुग्णालयांचा कायापालट; १५.७२ कोटींतून उभारणार ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा’ दवाखाना

Revenue Department: महसूल विभागाचा मोठा निर्णय: ११ जिल्ह्यांत नवी कार्यालये आणि १४३ पदांची भरती
2

Revenue Department: महसूल विभागाचा मोठा निर्णय: ११ जिल्ह्यांत नवी कार्यालये आणि १४३ पदांची भरती

आता जमीन मोजणी प्रक्रिया महिनाभरात; राज्यात 200 खासगी भूमापकांची नियुक्ती
3

आता जमीन मोजणी प्रक्रिया महिनाभरात; राज्यात 200 खासगी भूमापकांची नियुक्ती

राज्यातील साखर उद्योग संकटात; शेतकऱ्यांची 4315 कोटींची एफआरपी थकीत
4

राज्यातील साखर उद्योग संकटात; शेतकऱ्यांची 4315 कोटींची एफआरपी थकीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.