Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kshitija Ghosalkar Poem: पहलगाममध्ये पर्यटकांच्या जागी आपण असतो तर? प्रथमेश परबच्या पत्नीची हृदयद्रावक कविता; पाहा Video

अभिनेता प्रथमेश परबच्या पत्नीने युट्यूबवर पहलगाम हल्ल्यासंबंधित एक कविता शेअर केली आहे. क्षितिजा घोसाळकरने तिच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 30, 2025 | 08:49 PM
Kshitija Ghosalkar Poem: पहलगाममध्ये पर्यटकांच्या जागी आपण असतो तर? प्रथमेश परबच्या पत्नीची हृदयद्रावक कविता; पाहा Video

Kshitija Ghosalkar Poem: पहलगाममध्ये पर्यटकांच्या जागी आपण असतो तर? प्रथमेश परबच्या पत्नीची हृदयद्रावक कविता; पाहा Video

Follow Us
Close
Follow Us:

काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ ला हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट पसरली आहे. कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त भावना व्यक्त करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अशातच अभिनेता प्रथमेश परबच्या पत्नीने युट्यूबवर पहलगाम हल्ल्यासंबंधित एक कविता शेअर केली आहे. क्षितिजा घोसाळकरने तिच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्षितीजा घोसाळकरची कविता सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली असून चाहते कौतुक करीत आहेत.

‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज

क्षितिजा घोसाळकरने लिहिलेली कविता

जे घडलंय त्यामुळे पहलगाम आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय, अशी अनामिक भीती वाटतेय…
तुम्हाला ही ना?… हे सगळं आपल्याबाबतीत घडलं असतं तर, त्या पर्यटकांच्या जागी आपण असतो तर…
आपलाच भाऊ, वडील, काका किंवा आपलंच कुटुंब असतं तर…
माझ्यासारखे तुमच्याही मनात हे प्रश्न येऊन गेले असतील, एक नाही हजार वेळा….
हो ना? सुदैवाने प्रत्यक्षरित्या आपल्याबाबतीत काहीही झालं नाही, आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित आहोत,
पण आहोत का? काही शब्दांची ना आयुष्यभरासाठी भीती वाटतेय…
लाल रंग, धर्म, शांतता, मिनी स्वित्झर्लंड आणि पहलगाम,
काय आहे ना….लाल रंग बघितल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचं गांभीर्यचं कळतं नाही.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह, नवविवाहितेचं कायमचं पुसलं गेलेलं कुंकू,
तिच्या हातातील चुडा आणि रडून-रडून लाल होऊन शून्यात गेलेले ते डोळे…
हे सगळं बघितल्यानंतर आमची सुरक्षा व्यवस्था जागृक होते, मग आम्ही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो,
तोपर्यंत हे आकडे वाढत जातात, या आकड्यांमागची हाडामासांची निष्पाप माणसं, त्यांचं कुटुंब कायम स्वरुपी उद्ध्वस्त होतात.

दोष कसला होता हिंदू असण्याचा?
मृत्यूच्या तावडीतून सुटण्यासाठी अल्लाह हू अकबर बोलण्याचा,
एका पत्नीने पतीसाठी आकांडतांडव करण्याचा की, पुन्हा आमच्या हिंदूचं असण्याचा,
केवळ हिंदू धर्म म्हणून सरळ आपल्याला गोळ्या घातल्या जातात,
बायको समोर तिचं कुंकू पुसलं जातं,
मुलीसमोर वडिलांना मारलं जातं आणि खतना झालाय की नाही हे पाहायला उघडंही केलं जातं…
हे ऐकून आताही रक्त खवळतंय ना, तळ पायाची आग मस्तकात जातेय ना,
काही नाही रिलॅक्स हे फार थोड्या दिवसांसाठी आहे, काय ती सुपरपॉवर आहे ना आपल्याकडे,
याआधी काही कमी हल्ले झालेत, मग तो २६/११ चा असो, संसदेवरचा असो, पुलवामाचा असो,
हल्ल्याच्या दुसऱ्याचं दिवशी स्पिरिट ऑफ मुंबई, स्पिरिट ऑफ इंडियाच्या नावाखाली पुन्हा जैसे थे.
जसं उत्तर आपण उरी हल्ल्यातून दिलं ना, तसंच उत्तर या हल्ल्यासुद्धा द्यायला हवं…
नाही, नको कारण भारताच्या ते शांततेला शोभणारं नाही,
कशाला अहो तो धर्म वगैरे, रमूयात ना आपल्या जातीपातीच्या लढाईत,
भाषेची लढाई तर आहेच सुरू, गावागावातील सीमाबद्दल आपण भांडत राहू, लढत राहू
आणि सीमेपलीकडून येऊन धर्म या एका शब्दावरून आपल्यावर बेछूटपणे वार करून ते पसारही होतील, तसे आता झाले तसेच…

बरं ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नाहीच आहे,
तसं असतं तर दहशतवाद्यांच्या तावडीतून हिंदू पर्यटकांना वाचवणारी व्यक्ती पण मुस्लिम होती,
सुरक्षित स्थळी पर्यटकांना पोहोचवणारा घोडे चालकही मुस्लिम होता
आणि बाहेरचं वातावरण शांत होईपर्यंत आपल्या घरात राहू देणारे खाऊ-पिऊ घालणारे लोकंही कश्मिरी मुस्लिमच होते,
त्यामुळे लढाई आहे ती सडलेल्या विचाऱ्यांच्या दहशतवाद्यांची, या हल्ल्यानंतर काश्मिरला पर्यटकाचं येणं बंद होईल,
काश्मिरी अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, या मास्टरमाइंड गेमला काय म्हणायचं,
काय करायचं या परिस्थितीत, धर्म बदलायचा, हिंदू आहोत म्हणून गोळ्या खाऊन मरून जायचं ?
की काही दिवसांनी याचचं रुपांतर राजकारण्याच्या एका नवीन भागात होईल त्यात सामिल व्हायचं,
सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करून गप्प बसायचं, दहशतवाद्यांना दोन-चार शिव्या घालून शांत व्हायचं?
की काश्मीर जाणं बंद करायचं की पुन्हा दुसरा हल्ला बघण्याची वाट बघायची
ते आले, ते मारून गेले आणि आता आपण त्याच्याबद्दल बोलतोय, पण ते आलेच कसे?
इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी पर्यटक येतात, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुठे होती?

कुठल्या राजकारण्याच्या सुरक्षिततेत बिझी होते की कुठल्या वीआयपीला अटेंड करत होते, याबद्दल चौकशी झाली?
काश्मीरला येणं बंद करू नका, तो आपल्याच देशाचा एक भाग आहे,
काही पर्यटक आता तिथे गेलेत सुद्धा, कारण आता जगात जितकी सिक्युरिटी नसेल ना, तितकी सिक्युरिटी पहलगाममध्ये असेल,
पण पुन्हा तेच ना, काही निष्पाप जीव गेल्याशिवाय आपल्याला सुरक्षिततेचं गांभीर्यचं कळतं नाही,
या प्रश्नावलीत उत्तर सापडतं नाहीये, ज्यावर गोळीबार झालाय त्याच्या कुटुंबियांचं,
अहो आता कितीही कठोर निर्णय घ्या, लाखो रुपयांची मदत करा, दिलासे द्या, श्रद्धांजली वाहा,
पण त्यांच्या घरातील त्या कर्त्या पुरुषाची जागा कोणतीच मदत कधीच रिप्लेस करू शकत नाहीय
आणि याच हल्ल्याचं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आतातरी शांततेचं स्पिरिट बाजूला ठेवा आणि कठोर निर्णय घ्या,
केवळ महाराष्ट्रात ५ हजार २३ पैकी ५१ पाकिस्तानी नागरिकांकडे अधिकृत कागदपत्र आहेत, उरलेल्यांचं काय?
आपल्या आसपास असे कितीतरी लोक फिरत असतील ज्याची कल्पना सुद्धा नाहीये,
या आकडेवारीनंतर पुन्हा मनात शंकेची पाल चुकचुकली.
जे घडलंय त्यामुळे पहलगाम आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय की काय अशी अनामिक भीती वाटतेय. तुम्हालाही ना?

अभिजित सावंत म्हणतोय, ‘तुझी चाल तुरूतुरू’, तरूणाईसाठी नव्या ढंगात होणार पेश

Web Title: Actor prathamesh parab wife kshitija ghosalkar shared poem on you tube pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • marathi actor
  • Pahalgham Terror Attack

संबंधित बातम्या

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
1

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
2

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?
3

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
4

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.