(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अलीकडेच बहुप्रतिक्षित कॉमेडी ॲक्शन चित्रपट ‘हेरा फेरी ३’ बद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. परेश रावल यांनी ‘हेरा फेरी’च्या सिक्वेलपासून स्वतःला दूर केले आहे. ही बातमी येताच चाहत्यांचे मन दुखावले. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या आयकॉनिक जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. अशा परिस्थितीत, करार झाल्यानंतर परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्याने प्रेक्षकांना त्रास होत आहे. तसेच आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपट सोडण्याच्या निर्णयावर परेश रावल यांनी मोठा खुलासा केला आहे. अभिनेता नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
आधी स्टार किड्सना केले टार्गेट, आता अभिनयातून स्वतः घेतला ब्रेक; नक्की बाबिल खानचे चालले तरी काय ?
परेश रावल यांनी कारण सांगितले
दरम्यान, आता परेश रावल यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. अभिनेत्याचे ताजे विधान समोर आले आहे. जेव्हा परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ ला निरोप दिल्याची बातमी समोर आली, तेव्हा याचे कारण सर्जनशील मतभेद असल्याचे सांगण्यात आले. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की परेश रावल यांचे निर्मात्यांशी सर्जनशील मतभेद आहेत आणि म्हणूनच ते आता चित्रपट करण्यास नकार देत आहेत. मात्र, आता परेश रावल यांनी या अफवांवर मोठा खुलासा केला आहे.
I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025
चित्रपट निर्मात्यासोबतच्या सर्जनशील मतभेदांवर अभिनेत्याची प्रतिक्रिया
परेश रावल यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ट्विट केले आहे आणि त्यांच्या निर्णयाबद्दल बोलताना चाहत्यांचे सर्व गैरसमज दूर केले आहेत. परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘हेरा फेरी ३ सोडण्याचा माझा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता हे मी नोंदवू इच्छितो. मी पुन्हा एकदा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणतेही सर्जनशील मतभेद नाहीत. चित्रपट दिग्दर्शक श्री. प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.’ असे अभिनेत्याने या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले आहे.
Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!
‘हेरा फेरी ३’ सोडण्याचे कारण उघड झाले नाही
आता परेश रावल यांनी त्यांच्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले आहे की त्यांनी चित्रपट निर्मात्यांशी असलेल्या सर्जनशील मतभेदांमुळे ‘हेरा फेरी ३’ चित्रपट सोडला नाही. तथापि, अभिनेत्याने अद्याप हे उघड केलेले नाही की त्याच्या निर्णयामागील खरे कारण काय आहे? तो या चित्रपटात का काम करत नाहीये? आता चाहत्यांनाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. तसेच आता परेश रावल यांना चित्रपटामध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरी राहणार आहे. आणि यासाठीच चाहते निराश झाले आहे.