"पण भयानक वाईट घडले..." तुषार घाडिलकरच्या आत्महत्येवर मराठमोळी अभिनेत्री हळहळली
नाटक, मालिका आणि चित्रपट या तिनही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेता तुषार घाडिगांवकरने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून अवघी इंडस्ट्री हळहळली आहे. इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. ‘मन कस्तुरी रे’, ‘लवंगी मिरची’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘हे मन बावरे’ आणि ‘झोंबिवली संगीत बिबट’ सारख्या अनेक कलाकृतींच्या माध्यमातून ३२ वर्षीय अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. त्याच्या आत्महत्येवर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोस्ट करताना दिसत आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी तुषार घाडिगांवकरच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.
Salman Khan ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त, भाईजानने कपिल शर्मा शोमध्ये केला मोठा खुलासा!
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी लिहिलंय की,
“रंगभूमी बळ देते… असं म्हणता म्हणता… वाईट बातमी… तुषार घाडिगांवकर ह्या रंगकर्मीची…! खरंतर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेजचे… अभिनयकडून अनेकदा त्याच नाव ऐकलेले… भेटले ही होते, काम नव्हतं केलं… पण भयानक वाईट घडले… हिच जी फेज येते त्या वेळीस बोलायला हवं, मार्ग निघतो… ”
“मंडळी क्षमस्व…
माहिती जी मला मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाहीय हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले.
त्या बद्दल मित्रा माफ कर मला..! तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते वाईट झालं.
सांगो वांगी जे कानावर पडल त्यामुळे शेअर कराव वाटलं.
पण तरीही माझा मुद्दा खोडवा असं वाटत नाहीय…
कलाकारांना अर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी ह्यासाठी फंड करावा असं खुप वाटतं… नंतर ते पैसे कमवून त्यांनी फेडावे…! सोसायटी मधून कसं लोन घेता येतं अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा…
त्याची काहीतरी सिस्टिम असावी…
परतफेडीचे नियम नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा…!
रंगमंच कामगार संघटना आहे, ज्युनियर आर्टिस्टसाठी त्यांची संघटना आहे… संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांच होत नाही. कारणं माहित नाही…! मदत करतात ही काही मित्र मैत्रिणी पण नंतर ते ही पाठ फिरवतात. त्याला दोषी ही काही कलाकार आहेतच जे पैसे घेऊन गूल होतात. त्याच पैशांची दारू पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे.. फार दुष्ट चक्र आहे हे.. पण तरीही.. काहीतरी मार्ग काढायला हवा..! ताकद, बळ, द्यायला हव.
हातात कामं नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारत्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जात..
आमचं फिल्ड बेभरवशाच… त्यामुळे ही फेज प्रत्येकाला फेस करावीच लागते..
साहित्य, नाट्य, संमेलनसाठी दिला जातो त्यातूनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का?? किंवा जसं नाटक सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तस कलाकार जगावा, (प्रामाणिकपणा पडताळून घ्यावा हवं तर) तर त्यासाठी वरदान/ जीवदान.. असं काही स्किम करता येईल का?? एक भाबडा विचार..!
त्याला ही अनेक फाटे फुटतीलच.. पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल.
पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणीनों..???? ही वेळ कोणावरही येऊ शकते
पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया.
स्वतःचा संसार चालवण हे ज्याच्या त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो
त्यासाठी काहीतरी स्कीम,प्रॉव्हिजन बांधू शकतो का आपण???”
दुसऱ्या दिवशी ‘सितारे जमीन पर’ची गगन भरारी, आमिर-जेनेलियाच्या चित्रपटानं कमावले कोट्यवधी रुपये