Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra: ‘शोले’ मध्ये ‘वीरू’ नाही तर करायची होती ‘ही’ भूमिका, धर्मेंद्र यांचा हा ऑफ कॅमेरा किस्सा तुम्हाला माहितेय का ?

. ठाकूर, गब्बर, बसंती याप्रमाणेच प्रेक्षकांची हृदय ज्यांनी जिंकलं ती जोडी म्हणजे जय वीरुची. पण तुम्हाला माहितेय का ? वीरुची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारायची होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 24, 2025 | 03:53 PM
Dharmendra: ‘शोले’ मध्ये ‘वीरू’ नाही तर करायची होती ‘ही’ भूमिका, धर्मेंद्र यांचा हा ऑफ कॅमेरा किस्सा तुम्हाला माहितेय का ?
Follow Us
Close
Follow Us:
  • धर्मेंद्रला ‘वीरू’ नाही, ‘ठाकूर’ बनायचं होतं
  • धर्मेंद्र यांचा हा ऑफ कॅमेरा किस्सा तुम्हाला माहितेय का ?
  • शोले सिनेमाचे रंजक किस्से
मैत्री कसी असवी तर जय वीरु सारखी असं हमखास म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे शोले सिनेमातील दोन जीवलग मित्र. सिनेमा प्रदर्शित होऊन कितीतरी काळ लोटला मात्र तरीही प्रेक्षकांच्या मनावर पडलेली छाप मात्र पुसली गेली नाही. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेची, संवादांची जादू आणि कथानकाचा भव्यपणा यामागे अनेक भन्नाट कॅमेऱ्यामागचे किस्से दडलेले आहेत. या किस्स्यांनीच ‘शोले’चा प्रवास अधिक रंजक बनवला. ठाकूर, गब्बर, बसंती याप्रमाणेच प्रेक्षकांची हृदय ज्यांनी जिंकलं ती जोडी म्हणजे जय वीरुची. पण तुम्हाला माहितेय का ? वीरुची भूमिका साकारणारे धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारायची होती.

 

धर्मेंद्र यांना सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायची इच्छा होती. मात्र वीरूची मस्ती, विनोद आणि बसंतीसोबतची केमिस्ट्री पाहून त्यांनी पात्र बदलण्याचा निर्णय घेतला. याच बरोबर आणखी एक कारण होतं ते म्हणजे हेमा मालिनी. वीरु आणि बसंतीचा जेव्हा जेव्हा भावनिक सीन असायचा तेव्हा धर्मेंद्र युनिटमधील लोकांना पैसे देऊन रिटेक घ्यायला सांगायचे. सिनेमाच्या शुटींग दरम्यानच धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्या बद्दल प्रेम वाटायला लागलं होतं त्यांच्या प्रेमाची सुरुवातच या सिनेमामुळे झाली असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. ठाकूरची व्यक्तिरेखा साकारायची मनात इच्छा असताना देखील केवळ प्रेमाखातर त्यांनी वीरुच्या व्यक्तिरेखेला मान्य केलं.

या सिमेमाच्या ऑफ कॅमेरा किस्से सांगायचे झालेच तर त्याचा वेगळा सिनेमा करावा लागेल. धर्मेंद्र यांना जसं या सिनेमामुळे प्रेम मिळालं तसंच त्यांना खऱ्या आयुष्यात जय देखील मिळाला ते म्हणजे अमिताभ बच्चन .यांच्याशी झालेली घनिष्ट मैत्री. शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली. दोघेही रात्री रामगडच्या लोकेशनवर एकत्र बसून चहा, गप्पा आणि स्क्रिप्ट चर्चेत वेळ घालवत असायचे. धर्मेंद्र अमिताभला म्हणायचे “तू जयच नाहीस, तू माझा छोटा भाऊ आहेस.”

 पहिलं मानधन फक्त 51 रुपये! बॉलीवूडचे He-Man यांनी शिक्षण कुठे घेतले? जाणून घ्या गावातील शाळेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

या दोन्ही मातब्बर अभिनेत्यांच्या मैत्रीचे किस्से देखील तितकेच रंजक आहेत. शूटिंग ब्रेकमध्ये संपूर्ण युनिट क्रिकेट खेळायचं तेव्हा धर्मेंद्र बॅटींग करायचे. असं शुटींगच्या मधल्या वेळेत क्रिकेट खेळताना धर्मेंद्र बॅटींग करत होते आणि अभितान फिल्डींग करत होते. त्यावेळी अमिताभने कॅच सोडल्यावर धर्मेंद्र हसत म्हणाले
“जय, दोस्ती निभावतोयस का, की कॅच टाळतोयस!” त्यावेळी संपूर्ण .युनिट हसायला लागलं होतं.

“ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे” गाण्याचं वन टेक शुट

या गाण्याच्या शूटमध्ये बाइकवर बॅलन्स करणं अवघड होतं. या गाण्याच्या शूटमध्ये बाइकवर बॅलन्स करणं म्हणजे तारेवरची कसरत होती. धर्मेंद्र बाइक चालवत आणि अमिताभ मागे बसले होते. हा सीन किमान 20–25 मिनिटे सलग शूट झाला आणि दोघांनीही एकदाही तक्रार केली नाही. त्यांच्या समजूतदारीवर
शेवटी सिप्पी म्हणाले “तुम्ही दोघे खऱ्या आयुष्यातही दोस्तच दिसता.शूटिंगदरम्यान ज्या दिवशी अमिताभचा पत्ता लागायचा नाही, त्या दिवशी लहान अभिषेकला धर्मेंद्र सांभाळायचे. धर्मेंद्र त्याला आपल्या खांद्यावर घेऊन फिरायचे. म्हणूनच अभिषेक आजही म्हणतो “धर्म पाजी माझे दुसरे बाबा सारखे आहेत.” असे हे शोले मधील जय वीरु फक्त सिनेमातच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील जीवगल मित्र असल्याचे अनेक किस्से आहेत.

Dharmendra Biography: पंजाबमध्ये जन्म, मेहनतीने कमावले अब्जावधी संपत्ती; करोडो लोकांच्या मनात निर्माण केले स्थान

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: जय–वीरूची मैत्री इतकी प्रसिद्ध का आहे?

    Ans: शोलेमधील जय–वीरूची जोडी खरी मैत्री कशी असावी याचं प्रतीक मानली जाते. सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक दशके झाली असली तरी त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहेत.

  • Que: धर्मेंद्र यांना खरं तर कोणती भूमिका करायची होती?

    Ans: धर्मेंद्र यांना सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायची होती. पण वीरूचं विनोदी आणि मस्तीखोर पात्र, तसेच बसंतीसोबतची केमिस्ट्री पाहून त्यांनी शेवटी वीरूची भूमिका स्वीकारली.

  • Que: धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका स्वीकारण्यामागे खास कारण होतं का?

    Ans: होय. शूटिंगदरम्यान त्यांना हेमा मालिनींबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. बसंती आणि वीरूच्या भावनिक दृश्यांमध्ये जास्त वेळ एकत्र राहण्यासाठी ते युनिटमधील कर्मचाऱ्यांना रिटेक घ्यायला सांगत असत.

Web Title: Do you know the off camera story of the movie sholay where dharmendra wanted to play the role of thakur not veeru

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • Bollywood
  • dharmendra
  • Hema Malini

संबंधित बातम्या

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत
1

सामंथाचा ‘Maa Inti Bangaram’चा टीझर रिलीज; ॲक्शन अवतारात दिसली अभिनेत्री, थरारक अभिनय पाहून चाहते चकीत

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’
2

‘Border 2’ मध्ये वरुण धवनच्या अभिनयाची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकले निर्माते; म्हणाले, ‘ या देशद्रोहींना…’

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
3

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?
4

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.