या दोन गोष्टी पाण्यात मिसळून प्या; एका दिवसांत सर्दी-खोकला होईल दूर
सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी तुळस आणि आल्याचा काढा भरपूर फायदेशीर ठरतो. याला बनवणेही फार सोपे आहे.
यासाठी एक कप पाण्यात तुळशीची पाने आणि आले घालून पाणी चांगलं उकळवून घ्या. यानंतर यात मध मिसळा.
तुमचा काढा तयार आहे, काढा हलका कोमट झाला की त्याचे सेवन करा. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन करु शकता.
तुळस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर आले कफ विरघळवते आणि घशाला आराम देते. मधामुळे खवखवणाऱ्या घशापासून आराम मिळतो.
हे काढा शरीराला संसर्गापासून वाचवण्यासही मदत करेल आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल.