Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांची कर्जमाफी ठरतोय मस्करीचा विषय? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी

Manikrao Kokate controversial statement : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीच शेतकऱ्यांवर कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले. जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2025 | 03:21 PM
Agriculture Minister Manikrao Kokate apologizes on controversial statement farmer loan waiver

Agriculture Minister Manikrao Kokate apologizes on controversial statement farmer loan waiver

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्यांना मोठे निराश केले आहे. यंदाच्या महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होते. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे माफीच्या प्रतिक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अर्थिक संकट आले आहे. यामध्ये राज्याचे कृषीमंत्री हे शेतकऱ्यांविरोधात भाष्य करत असल्याचे दिसून आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्करीमध्ये हे वक्तव्य केले असल्याचे कोकाटे म्हणाले आहेत.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले. यामुळे संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली. यामधून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली. कृषीमंत्रीच शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यास असंवदेनशीलपणा दाखवत असल्याचा आरोप करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माणिकराव कोकाटेंचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान?

नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या माणिकराव कोकाटे यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारले. यावेळी ते म्हणाले, अजितदादा म्हणत आहेत, कर्जमाफी होणार नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्यांची तर कर्जमाफी होईल का? असा प्रतिप्रश्न शेतकऱ्याने केला. यावर कोकाटे म्हणाले की, “कर्ज घ्यायचं आणि पुढचे पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. जोपर्यंत कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत वाट पाहायची, असं शेतकरी करतात. कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांचीतरी गुंतवणूक आहे का? तसेच शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” माणिकराव कोकाटे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केली

माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी मस्करी केल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणूनच रामजन्मभूमीचा मुहूर्त साधून आज मी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरात दर्शनास आलो होतो. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी मी प्रभू रामचंद्रासाठी समृद्धी आणि सुख मागितले आहे. माझ्या कालच्या वक्तव्यामुळे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी मस्करीमध्ये बोललो. मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कालदेखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे,” अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

Web Title: Agriculture minister manikrao kokate apologizes on controversial statement farmer loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • maharashtra farmers
  • Manikrao Kokate
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
1

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान
2

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये
3

Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अ‍ॅक्शन मोडमध्ये

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल
4

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.