Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये AIMIM ला डावललं अन्…; असदुद्दीन ओवैसींनी केले विधान

All-party meeting after Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावरुन असदुद्दीन ओवैसी यांनी आमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2025 | 04:39 PM
AIMIM Asaduddin Owaisi invited to all-party meeting by Home Ministry after Pahalgam Terror Attack

AIMIM Asaduddin Owaisi invited to all-party meeting by Home Ministry after Pahalgam Terror Attack

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दहशदवादी हल्ल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र यामध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाला डावलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.24) नवी दिल्ली इथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 06 वाजता ही बैठक संसद भवनात होणार असल्याची माहिती समोर येत आहे.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीत माहिती देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सरकारने योजलेल्या उपायांबद्दल ते सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देणार आहेत. मात्र या बैठकीला असदुद्दीन ओवैसी यांना न बोलावल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन रोष व्यक्त केला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सोशल मीडिया पोस्टमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी लिहिले आहे की, “पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीबाबत मी काल रात्री किरेन रिजीजू यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की ते फक्त “05 किंवा 10 खासदार” असलेल्या पक्षांनाच आमंत्रित करण्याचा विचार करत आहेत. जेव्हा मी विचारले की कमी खासदार असलेल्या पक्षांना का नाही, तेव्हा त्यांनी सांगितले की बैठक “खूप लांब” होईल. जेव्हा मी विचारले की “आमचे काय, लहान पक्ष?” तेव्हा त्यांनी विनोद केला की माझा आवाज तरीही खूप मोठा आहे. ही भाजपची किंवा इतर पक्षाची अंतर्गत बैठक नाही, ती दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरुद्ध एक मजबूत आणि एकत्रित संदेश देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आहे”

पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व पक्षांच्या चिंता ऐकण्यासाठी एक अतिरिक्त तास घालवू शकत नाही का? तुमच्या स्वतःच्या पक्षाकडे बहुमत नाही. १ खासदार असलेला पक्ष असो किंवा १०० खासदार, ते दोघेही भारतीयांनी निवडून दिले आहेत आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर त्यांचे म्हणणे ऐकण्यास पात्र आहेत. हा राजकीय मुद्दा नाही, तो एक राष्ट्रीय मुद्दा आहे. सर्वांना ऐकले पाहिजे. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की ही खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय बैठक व्हावी, संसदेत खासदार असलेल्या प्रत्येक पक्षाला आमंत्रित केले पाहिजे,” अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला होता.

Regarding the Pahalgam All Party Meeting, I spoke to @KirenRijiju last night. He said they’re thinking of inviting only parties with “5 or 10 MPs.” When I asked why not parties with fewer MPs, he said that the meeting would get “too long.” When I asked “What about us, the smaller…

— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 24, 2025

मात्र त्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांना गृहमंत्र्याकडून सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, गृहमंत्र्याकडून त्यांना आता फोन आला होता. यावेळी त्यांना गृहमंत्री अमित शाह यांनी विचारले की कुठे आहात? तर हैदराबादमध्ये असल्याचे सांगितले. सायंकाळी सर्वपक्षीय बैठक आहे तर लवकर यावे, अन्यथा उशीर होईल, असे गृहमंत्री म्हणाले. यावर लवकरात लवकर जे विमान उपलब्ध होईल त्याने दिल्लीमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करेन, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले आहे.

#WATCH | | Hyderabad, Telangana: On the all-party meeting called over #PahalgamTerroristAttack, AIMIM Chief Asaduddin Owaisi says, “The reason for which the all-party meeting is called is of national importance. The Home Minister just called me and asked where I am. He has asked… pic.twitter.com/MnKF9TjiEe

— ANI (@ANI) April 24, 2025

Web Title: Aimim asaduddin owaisi invited to all party meeting by home ministry after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.