Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil : “मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे…”, अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले…

अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा चर्चा होत आहे. या दोन्ही गटाकडून त्यासंबंधीचे दावे करण्यात येत आहे.नेमकं काय म्हणाले जयंत पाटील..

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 31, 2026 | 03:47 PM
"मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे...", अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले...

"मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे...", अजितदादा पवारांबाबत जयंत पाटील स्पष्टच बोलले...

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होताच राष्ट्रवादीमध्ये जोरदार हलचाली सुरु झाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील असा निर्णय दोनच दिवसात घेण्यात आला. मात्र याबाबतचे कोणतेही निर्णय माझ्याशी चर्चा करून झाले नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला.

साहेबांच्या देखत मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत..

ते म्हणाले, “ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याच्या सर्व बैठका मी स्वत:च केल्या होत्या, अजितदादा त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती, अलीकडच्या काळात अनेक बैठका झाल्या, अनेकदा ते माझ्या घरीच येऊन चर्चा करयचे, जवळपास चारवेळा ते रात्री येऊन चर्चा करून जेवण करून उशिरा जायचे, साहेबांच्या देखत मला दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत, आणि माझ्या बद्दल जनमाणसात जी प्रतिमा झाली आहे, ती पुसून मला पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहे. याबाबत त्यांचा आग्रह होता, पवार साहेबांच्या बाबत त्यांच्या मनात प्रचंड आदर होता, त्यांनी त्याबाबत खूपवेळा माझ्याकडे भावना व्यक्त केल्या. मागील दोन अडीच वर्षांचा कालखंड विसरून आपण सर्वजण एकत्र येऊ, महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू, ही त्यांची अंतिम आणि फार तीव्र इच्छा होती.”

 सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाची इतकी घाई कशासाठी? पडद्यामागे नेमकं काय घडलं?

जयंत पाटील ठरवतील ती तारीख…

ते म्हणाले, “ अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांसह दोनवेळा बैठक झालेली होती, त्यानंतर दि. १६ जानेवारी रोजी शेवटी माझ्या घरी बैठक झाली, त्यावेळी आमच्या पक्षातील काही प्रमुख यावेळी उपस्थित होते, आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढून निवडणुका झाल्यानंतर कार्यक्रम घेऊ, त्यांनी तर दि.८ सांगितली, मात्र नियोजित कार्यक्रम असल्याने पुढे करू असे सांगताच, जयंत पाटील सांगतील त्या दिवशी करू असे दादांनी सांगितले, त्यावेळी आम्ही १२ तारीख निश्चित केली.”

धावपट्टी लहान म्हणून गेलो दुसऱ्या दिवशी…

अजितदादांसोबत झालेल्या बैठीकीत एकत्रीकरणाची चर्चा झाल्यावर पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही विमाने जाऊ असे म्हणताच दादा म्हणाले तिथली धावपट्टी लहान आहे, माझे विमान तिकडे उतरणार नाही, मग आम्ही पहाटे गाडीने निघून सकाळी पवार साहेबांकडे जाऊन निर्णय सांगून १२ तारीख ठरवली. आठ नऊ पर्यत निवडणुका पूर्ण होतील, त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र करू असं ठरले.

दादांनी सर्व नेत्यांना दिली होती कल्पना

ते म्हणाले, काही बैठकांना सुप्रिया सुळे यांना देखील उपस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न केला, राष्ट्रवादी एकत्रीकरण बाबत पक्षातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन बूजबळ यांच्यासह सर्वच पक्षातील अन्य आमदारांना देखील त्यांनी याबाबत कल्पना दिली असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले होते. मी सांगितल्यावर माझे सर्व आमदार निर्णय मान्य करतात, कोणाचेही वेगळे मत असणार नाही, असेही दादा म्हणाले होते.

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी..

अजितदादांनी सर्व चर्चा माझ्याशी करून निर्णय झाल्यानंतरच आम्ही सर्व नेत्यांना या चर्चेत सहभागी करून घेतले होते, सर्वांची याबाबत सहमती होती. अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला पाहिजे, एकत्रीकरणाला कोणाचाही विरोध नव्हता, उलट पाठींबा होता. त्यामुळे आता काय निर्णय होणार हे पहावे लागणारे आहे, सध्या त्यांच्या पक्षाचे सर्व सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ घेत आहेत.

Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही…; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Ajit pawar plane crash jayant patil spoke clearly about ajitdada pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • jayant patil
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा
1

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर? रोहित पवार यांचा मोठा खुलासा

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
2

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.