Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून? अंजली दमानिया यांच्या दाव्याने उडाली खळबळ

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या आरोपींना अटक करण्याची मागणी होेत असताना खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. नक्की काय आहे दावा जाणून घ्या

  • By प्रीति माने
Updated On: Dec 28, 2024 | 10:56 AM
अंजली दमानियांना संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची माहिती देणारी ती व्यक्ती कोण; पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर

अंजली दमानियांना संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची माहिती देणारी ती व्यक्ती कोण; पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार वातावरण तापले आहे. बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे लातूर बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोप देखील अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरले आहे. तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्किम कराड हा देखील फरार असल्यामुळे तसेच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले आहेत. वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यामधील अर्थिक जमीनीचे व्यवहार आणि संबंध त्यांनी उघड केले होते. तसेच परवानाधारक बंदुक असणाऱ्या लोकांची यादी देखील अंजली दमानिया यांनी बाहेर आणली होती. त्याचबरोबर वाल्मिक कराड याचा बंदुक हवेत फिरवताना व्हिडिओ देखील अंजली दमानिया यांनी पोस्ट केला होता. त्यामुळे बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व आरोपानंतर आता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाली असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “काल रात्री मला एका अनोळखी इसमाचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्कमुळे कॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यानंतर त्या इसमाने मला व्हॉईस नोट पाठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण तीन आरोपींचा खून झाला आहे, अशी माहिती या इसमाने दिली”, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “हे ऐकून मी हबकलेच. ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी असून त्यापैकी तिघांचा खून झाल्याची माहिती अनोळखी इसमाने दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे.” या माहितीची मी खातरजमा केलेली नाही आणि फोन करणारा अनोळखी माणूस कोण आहे, याचीही माहिती नसल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आज (दि.28) या मूक मोर्चामध्ये साधारण 50 गावांचे लोक सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. या मोर्चामध्ये राजकीय नेते देखील असणार आहेत. मात्र अंजली दमानिया या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत. हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे मोर्चे काढत आहेत. हे सर्व राजकारण असून खरंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळे आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Anjali damania alleges that the accused in the beed santosh deshmukh murder case were murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी
1

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

संतोष देशमुखांच्या लेकीची कमालच; वडिलांच्या मृत्यूनंरही मिळवले बारावीत घवघवीत यश
2

संतोष देशमुखांच्या लेकीची कमालच; वडिलांच्या मृत्यूनंरही मिळवले बारावीत घवघवीत यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.