कोरटकरची पाच तास कसून चौकशी सावंतांना फोन केल्याची कबुली
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर कोर्टाकडून आधी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र तो पोलिसांकडे कोणताही जबाब देण्यासाठी न आल्यामुळे त्याला अटक करण्याचे कोल्हापूर कोर्टाकडून आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. मात्र तो कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या मागणीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन देखील करण्यात आले. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांसह कॉंग्रेस नेते देखील उपस्थित होते. कॉंग्रेस नेत्यांनी प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आता भाजप नेते परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत कोरटकर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी लपून होता, असा गंभीर आरोप परिणय फुके यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते परिणय फुके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचे काम कॉंग्रेसने केले असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. ते म्हणाले की, “तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकरला अटक झाली. पण कोरटकर हे तेलंगणामध्ये एका कॉंग्रेस नेत्याकडे लपून बसले होते. यामागे कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच करत होते हे स्पष्ट झालं आहे. कुठेतरी कोरटकरवर कडक कारवाई आणि शिक्षा झाली पाहिजे,” असे मत भाजप नेते परिणय फुके यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली असून कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.