Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती सरकारमध्ये ‘या’ कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी

पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्ह्यांच्या प्रशासनावर परिणाम होत असून, विकासकामांमध्ये दिरंगाई होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2025 | 07:18 AM
महायुती सरकारमध्ये 'या' कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी

महायुती सरकारमध्ये 'या' कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सध्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे काही प्रमाणात मतभेद दिसून येत आहे. त्यातच रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांना सध्या पालकमंत्री नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, विकासकामे रखडण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन्ही ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीची स्वतंत्र बैठक आयोजित केली. मात्र, या बैठकीतही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. रायगड जिल्ह्यासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, गोगावले उपस्थित राहिले नाहीत.

याशिवाय, रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी देखील या बैठकीला पाठ फिरवली. आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी त्यांना निमंत्रण न मिळाल्याचे कारण दिले. गोगावले त्या दिवशी रायगडमध्येच होते. मात्र, तरीही त्यांनी बैठक टाळल्याची चर्चा आहे.

जिल्हा प्रशासनाच्या कामावर होतोय परिणाम

पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्ह्यांच्या प्रशासनावर परिणाम होत असून, विकासकामांमध्ये दिरंगाई होत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून होत आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांसाठी तातडीने पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी वाढत आहे. दरम्यान, मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी या वादाचा ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही.

डीपीसी बैठकीमध्ये मंत्र्यांची अनुपस्थिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यांचे नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत म्हणून अशा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र, मंत्र्यांची अनुपस्थिती हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना पालकमंत्री केव्हा मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना शिंदे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढतीये

राज्यातील महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे महायुतीपासून काहीसे दूर जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहण्याचा सिलसिला सुरू केला आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीबाबत तर्क-वितर्क वाढले आहेत. इतकेच नव्हे तर, ते महायुतीच्या कोणत्याही सभेतही दिसत नसल्यामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

Web Title: Dispute in mahayuti due to guardian ministership nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
1

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
2

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

Independence day 2025 : आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं…
3

Independence day 2025 : आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं…

Maharashtra News: महाराष्ट्रात मांसबंदी विक्रीला बंदी का; काय आहे नेमकं कारण?
4

Maharashtra News: महाराष्ट्रात मांसबंदी विक्रीला बंदी का; काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.