Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपसोबत राहिलो ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक; माजी उपमुख्यमंत्र्यांची कबुली

हरियाणामध्ये विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला आहे. सर्व पक्षांतील नेत्यांचा प्रचार जोरदार सुरु झाला असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान 2021 वर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा समोर आला आहे. आता मात्र भाजपसोबत सत्तेमध्ये असणाऱ्या नेत्याने युतीमध्ये राहून चूक केल्याची कबुली दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 22, 2024 | 10:52 AM
Dushyant Chautala in Haryana assembly elections

Dushyant Chautala in Haryana assembly elections

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा :  भाजप पक्षाला मागील दोन लोकसभा निवडणूकीपेक्षा यंदाच्या निवडणूकीमध्ये अपेक्षित असे यश मिळाले नाही. 400 पारचा नारा दिलेला असताना देखील स्वबळावर सत्ता भाजपला मिळवता आली नाही. यानंतर पूर्वी भाजपसोबत असणाऱ्या अनेक पक्षांनी आता साथ सोडत विरोधी भूमिका घेतली आहे. आता हरियाणा विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला आहे. देशातील भाजप सरकारच्या मागील कार्यकाळामध्ये शेतकरी आंदोलनाने देशाचे वातावरण तापले होते. मोदी सरकारने शेतकरीसाठी तीन नवीन कायदे आणले होते. त्याकाळामध्ये उत्तर भारतीय शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. आता हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये देखील या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा समोर येत आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत केलेली युती ही सर्वांत मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

2021 साली कृषी कायद्यामुळे देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांना याला तीव्रव विरोध करत तब्बल 378 दिवस आंदोलन केले. याचा परिमाण आता हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये देखील होत आहे. या आंदोलनावेळी घेतलेल्या भूमिकेबाबत हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या शेतकरी आंदोलनावेळी घेतलेली भूमिका चूकीची असल्याचे म्हणत त्यांनी भाजप पक्षावर हल्लाबोल केला आहे.

ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक

हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. प्रचारावेळी चौटाला म्हणाले, “आम्ही भाजपसोबत सरकार चालवलं. विकासकामे केली. मात्र, निवडणुकीत काही गोष्टींवर सहमती झाली नाही, तेव्हा भाजप आणि आमचे रस्ते वेगळे झाले. शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ती चूक आज स्वीकारत आहे. हरियाणातील जनता या निवडणुकीत साथ देईल,” अशी ग्वाही दुष्यंत चौटाला यांनी दिली आहे. यामुळे आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

दुष्यंत चौटाला हे शेतकरी आंदोलनावेळी भाजपसोबत सत्तेमध्ये होते. यावेळी त्यांनी भाजपने आपल्याला पुढे केल्याची खंत देखील व्यक्त केली. ते म्हणाले की, “शेतकरी आंदोलनात सर्वांत मोठा खलनायक मला ठरवण्यात आलं. आमच्या पक्षातील एकही सदस्य लोकसभा सदस्य आवाज उठवण्यासाठी नव्हता. आज नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहेत. पण, तेव्हा भाजपसोबत सरकार स्थापन केलं नसतं, तर हरियाणाच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसती,” असं देखील दुष्यंत चौटाला यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Dushyant chautala admits made a mistake by allying bjp haryana assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 10:52 AM

Topics:  

  • BJP
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
4

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.